शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

तमदलगे-अंकली रस्ता वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 20, 2015 00:01 IST

काम पूर्ण करण्याचे आव्हान : नुकसानभरपाई, जागेच्या प्रश्नामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

संदीप बावचे - जयसिंगपूर- ३१ मे पर्यंत कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश असले, तरी तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या मार्गावरील रस्त्यास अडथळा ठरणारी घरे, निमशिरगावची शाळा यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याप्रश्नी तमदलगे, निमशिरगाव व जैनापूर येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्यांतर्गत बसवान खिंड ते अंकली टोलनाका या दुपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. दुपदरी रस्त्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उखडण्यात आला असून, या भागातील जैनापूर, तमदलगे, निमशिरगावमधील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून या खराब रस्त्याचा सामना करीत आहेत. तमदलगेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर अर्धवट पुलाचे बांधकाम झाले आहे, तर तमदलगे गावातील रस्त्यास अडथळा ठरणारी सुमारे ३५ घरे व तीन धार्मिक मंदिरे काढण्याशिवाय पर्याय नाहीत. या घरातील लोकांचे पुनर्वसन होणार की, त्यांना मूल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रश्नी गावातील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही दखल घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तमदलगे-जैनापूर-निमशिरगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता उखडल्यामुळे रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रस्ता सुरळीत नसल्यामुळे जयसिंगपूर-निमशिरगाव एस.टी. व्हाया चिपरीमार्गे येत आहे. चिपरी-जैनापूर रस्त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. हा रस्ता ठेकेदार कंपनीनेच करून देण्याचे आहे. मात्र, या प्रश्नाकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याचीदेखील अवस्था दयनीय आहे. या रस्त्यावरील ओढ्यावर पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. या पुलाच्या बांधकामास अजून सुरुवातच नाही. अनेक समस्यांच्या गर्तेत हा बायपास रस्ता सापडला असताना ३१ मेपर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.अपघातास निमंत्रणबायपास मार्गावर दानोळी व उमळवाड फाटा येतो. मात्र, दुपदरीकरण करीत असताना कोणतेही नियोजन ठेकेदार कंपनीने केलेले नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही फाट्याजवळ दानोळी व उमळवाडहून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे एकतर भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल किंवा सेवामार्ग करणे गरजेचे आहे.आंदोलनकर्ते गायबवर्षभरापूर्वी अंकली फाटा ते तमदलगे खिंड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या कामात मातीचा भराव टाकला जात आहे, असा आरोप करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अजूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही आंदोलनकर्ते मात्र गायब झाले आहेत. त्यामुळे कोणी लोकप्रतिनिधी याप्रश्नी आवाज उठवणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.