शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

तमदलगे-अंकली रस्ता वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 20, 2015 00:01 IST

काम पूर्ण करण्याचे आव्हान : नुकसानभरपाई, जागेच्या प्रश्नामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

संदीप बावचे - जयसिंगपूर- ३१ मे पर्यंत कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश असले, तरी तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या मार्गावरील रस्त्यास अडथळा ठरणारी घरे, निमशिरगावची शाळा यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याप्रश्नी तमदलगे, निमशिरगाव व जैनापूर येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्यांतर्गत बसवान खिंड ते अंकली टोलनाका या दुपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. दुपदरी रस्त्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उखडण्यात आला असून, या भागातील जैनापूर, तमदलगे, निमशिरगावमधील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून या खराब रस्त्याचा सामना करीत आहेत. तमदलगेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर अर्धवट पुलाचे बांधकाम झाले आहे, तर तमदलगे गावातील रस्त्यास अडथळा ठरणारी सुमारे ३५ घरे व तीन धार्मिक मंदिरे काढण्याशिवाय पर्याय नाहीत. या घरातील लोकांचे पुनर्वसन होणार की, त्यांना मूल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रश्नी गावातील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही दखल घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तमदलगे-जैनापूर-निमशिरगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता उखडल्यामुळे रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रस्ता सुरळीत नसल्यामुळे जयसिंगपूर-निमशिरगाव एस.टी. व्हाया चिपरीमार्गे येत आहे. चिपरी-जैनापूर रस्त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. हा रस्ता ठेकेदार कंपनीनेच करून देण्याचे आहे. मात्र, या प्रश्नाकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याचीदेखील अवस्था दयनीय आहे. या रस्त्यावरील ओढ्यावर पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. या पुलाच्या बांधकामास अजून सुरुवातच नाही. अनेक समस्यांच्या गर्तेत हा बायपास रस्ता सापडला असताना ३१ मेपर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.अपघातास निमंत्रणबायपास मार्गावर दानोळी व उमळवाड फाटा येतो. मात्र, दुपदरीकरण करीत असताना कोणतेही नियोजन ठेकेदार कंपनीने केलेले नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही फाट्याजवळ दानोळी व उमळवाडहून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे एकतर भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल किंवा सेवामार्ग करणे गरजेचे आहे.आंदोलनकर्ते गायबवर्षभरापूर्वी अंकली फाटा ते तमदलगे खिंड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या कामात मातीचा भराव टाकला जात आहे, असा आरोप करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अजूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही आंदोलनकर्ते मात्र गायब झाले आहेत. त्यामुळे कोणी लोकप्रतिनिधी याप्रश्नी आवाज उठवणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.