शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:23 IST

ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधनत्यांच्या इच्छेनुसार देहदान

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे मुलगा डॉ. आशिष, मुलगी डॉ. तृप्ती, बहीण साहित्यीका डॉ. लीला पाटील, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनुराधा गुरव या मुळच्या सोलापुरातील बाळे गावच्या. वडिल वतनदार रंगनाथ पाटील हे पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांनी पाचही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पुढे १९६५ साली मौनी विद्यापीठात गणित आणि विज्ञान विषयांची शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. 

कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, बालसाहित्य,समीक्षण, नवसाक्षर , शैक्षणिक, लेख अशा सर्व लेखन प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली.माध्यमीक शाळा, बीएड महाविद्यालये, पॉलिटेक्निकमध्ये अध्यापनासोबतच प्राचार्य, संचालक, विभाग प्रमुख अशा विविधपदांवर त्यांनी काम केले. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागात काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

विधिसेवा प्राधिकरण, बाल न्याय मंडळ, कौटूंबिक प्रश्न निर्मूलन, लोकन्यायालय, जिल्हा बालन्यायालय अशा विविध समित्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, विद्यापीठाच्या तालुका, जिल्हा न्यायालयांच्या कायदा सल्ला समितीमध्ये २५ वर्षे काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न हाताळले.   आपुलकी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरु ठेवले.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, श्री. द. पानवलकर, साहित्य रत्न, वुमेन्स फौंडेशनचा साहित्य भूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.  त्यांचे ३० कथासंग्रह, १३ कादंबर्‍या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची ३० पुस्तके, नवसाक्षर साहित्याची ४३ पुस्तके, शैक्षणिक १२ पुस्तके, लेखसंग्रह १६ पुस्तके असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर