शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:23 IST

ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधनत्यांच्या इच्छेनुसार देहदान

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे मुलगा डॉ. आशिष, मुलगी डॉ. तृप्ती, बहीण साहित्यीका डॉ. लीला पाटील, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनुराधा गुरव या मुळच्या सोलापुरातील बाळे गावच्या. वडिल वतनदार रंगनाथ पाटील हे पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांनी पाचही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पुढे १९६५ साली मौनी विद्यापीठात गणित आणि विज्ञान विषयांची शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. 

कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, बालसाहित्य,समीक्षण, नवसाक्षर , शैक्षणिक, लेख अशा सर्व लेखन प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली.माध्यमीक शाळा, बीएड महाविद्यालये, पॉलिटेक्निकमध्ये अध्यापनासोबतच प्राचार्य, संचालक, विभाग प्रमुख अशा विविधपदांवर त्यांनी काम केले. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागात काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

विधिसेवा प्राधिकरण, बाल न्याय मंडळ, कौटूंबिक प्रश्न निर्मूलन, लोकन्यायालय, जिल्हा बालन्यायालय अशा विविध समित्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, विद्यापीठाच्या तालुका, जिल्हा न्यायालयांच्या कायदा सल्ला समितीमध्ये २५ वर्षे काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न हाताळले.   आपुलकी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरु ठेवले.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, श्री. द. पानवलकर, साहित्य रत्न, वुमेन्स फौंडेशनचा साहित्य भूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.  त्यांचे ३० कथासंग्रह, १३ कादंबर्‍या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची ३० पुस्तके, नवसाक्षर साहित्याची ४३ पुस्तके, शैक्षणिक १२ पुस्तके, लेखसंग्रह १६ पुस्तके असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर