शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

 भाजीपाल्यांचे दर स्थिर, अननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:09 IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.

ठळक मुद्देअननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले भाजीपाल्यांचे दर स्थिर

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.महापालिकेने स्वच्छता केल्याचे नाटक केले असले, तरी रविवारी बाजार भरल्यावर यातील फोलपणा दिसला आहे. गटारी तुंबून सर्व सांडपाणी संपूर्ण बाजारपेठेतील मुख्य मार्गावर पसरल्याने भाजी विकायची आणि खरेदी तरी कशी करायची, असा प्रश्न करत पाण्यातूनच वाट काढत खरेदी-विक्री सुरू होती. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी येत असल्याने या दलदलीत आणखीन भर पडत होती.दोन दिवसांपासून संततधार बरसणाºया पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. मागणी नसल्याने दर मात्र गेल्या आठवड्याइतकेच स्थिर आहेत. वांगी, भेंडी, कारली, गवार, दोडका, ढबू ३0 ते ४0 रुपये किलो आहेत. दुधी भोपळा, पडवळचे बाजारात आगमन झाले आहे. कोबी, फ्लॉवर १0 ते २0 रुपये गड्डा आहे.

मेथी अजूनही दुर्मीळ असून, २0 ते २५ रुपये पेंढी असा दर कायम आहे. कोथिंबिरीचे दर्शन बाजारात दुर्मीळ झाले आहे. दरही मागील आठवड्याप्रमाणे ४0 ते ५0 रुपये पेंढी असेच चढे आहेत. पालक, पोकळा, लाल भाजी, तांदळी १0 ते १५ रुपये पेंढी आहे. लिंबूंचे दर उतरले असले, तरी आल्याचे दर वाढत चालले आहेत. ८0 रुपये किलो असणारे आले आता १५0 रुपये किलोवर पोहोचले आहेत.पावसाचा सर्वाधिक फटका फळ बाजाराला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम संपला असून, त्याची जागा तोतापुरी आंब्यांनी घेतली आहे. २५ ते ३५ रुपये दराने विकला जाणारा तोतापुरी आंबा आता १0 रुपयांना तीनप्रमाणे विकला जात आहे. मोठ्या आकाराचा आंबा १५ ते २0, तर लहान आंबे १0 रुपयांना तीन आहेत. हीच परिस्थिती अननसाचीही झाली आहे. १0 ते ४0 रुपये असे दर आहेत. बाजारात सर्वत्र अननसच दिसत आहेत.टोमॅटोचे ढीगबाजारात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. १0 ते २0 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. मागील आठवड्यात हेच दर ४0 रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटो स्वस्त झाल्याने बाजारात लालभडक टोमॅटोचे ढीग वाढू लागले आहेत.बाजारात व्यापाऱ्यांची गर्दीपाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणी व आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत; त्यामुळे बाजारात विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमालीची रोडावली आहे. संपूर्ण बाजारपेठेत व्यापाऱ्यांची गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने खाली बसण्याची सोय नसल्यानेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर