शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

 भाजीपाल्यांचे दर स्थिर, अननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:09 IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.

ठळक मुद्देअननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले भाजीपाल्यांचे दर स्थिर

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.महापालिकेने स्वच्छता केल्याचे नाटक केले असले, तरी रविवारी बाजार भरल्यावर यातील फोलपणा दिसला आहे. गटारी तुंबून सर्व सांडपाणी संपूर्ण बाजारपेठेतील मुख्य मार्गावर पसरल्याने भाजी विकायची आणि खरेदी तरी कशी करायची, असा प्रश्न करत पाण्यातूनच वाट काढत खरेदी-विक्री सुरू होती. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी येत असल्याने या दलदलीत आणखीन भर पडत होती.दोन दिवसांपासून संततधार बरसणाºया पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. मागणी नसल्याने दर मात्र गेल्या आठवड्याइतकेच स्थिर आहेत. वांगी, भेंडी, कारली, गवार, दोडका, ढबू ३0 ते ४0 रुपये किलो आहेत. दुधी भोपळा, पडवळचे बाजारात आगमन झाले आहे. कोबी, फ्लॉवर १0 ते २0 रुपये गड्डा आहे.

मेथी अजूनही दुर्मीळ असून, २0 ते २५ रुपये पेंढी असा दर कायम आहे. कोथिंबिरीचे दर्शन बाजारात दुर्मीळ झाले आहे. दरही मागील आठवड्याप्रमाणे ४0 ते ५0 रुपये पेंढी असेच चढे आहेत. पालक, पोकळा, लाल भाजी, तांदळी १0 ते १५ रुपये पेंढी आहे. लिंबूंचे दर उतरले असले, तरी आल्याचे दर वाढत चालले आहेत. ८0 रुपये किलो असणारे आले आता १५0 रुपये किलोवर पोहोचले आहेत.पावसाचा सर्वाधिक फटका फळ बाजाराला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम संपला असून, त्याची जागा तोतापुरी आंब्यांनी घेतली आहे. २५ ते ३५ रुपये दराने विकला जाणारा तोतापुरी आंबा आता १0 रुपयांना तीनप्रमाणे विकला जात आहे. मोठ्या आकाराचा आंबा १५ ते २0, तर लहान आंबे १0 रुपयांना तीन आहेत. हीच परिस्थिती अननसाचीही झाली आहे. १0 ते ४0 रुपये असे दर आहेत. बाजारात सर्वत्र अननसच दिसत आहेत.टोमॅटोचे ढीगबाजारात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. १0 ते २0 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. मागील आठवड्यात हेच दर ४0 रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटो स्वस्त झाल्याने बाजारात लालभडक टोमॅटोचे ढीग वाढू लागले आहेत.बाजारात व्यापाऱ्यांची गर्दीपाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणी व आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत; त्यामुळे बाजारात विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमालीची रोडावली आहे. संपूर्ण बाजारपेठेत व्यापाऱ्यांची गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने खाली बसण्याची सोय नसल्यानेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर