शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वीरशैव-लिंगायतला स्वतंत्र धर्माची मागणी चुकीची- चंद्रशेखर महास्वामीजी : सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:01 IST

कोल्हापूर : वीरशैव हा सनातन धर्म तर लिंगायत ही आचरणपद्धती त्याचे पर्यायीवाचक नाव आहे. हा धर्म वेदागमाला अनुसरून असल्याने त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे मोर्चाद्वारे वीरशैव-लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ घोषित करण्याची मागणी चुकीची आहे. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन जातीनिहाय आर्थिक दुर्बल घटकांना सोयी-सुविधा कशा मिळतील यासाठी केंद्राकडे ...

कोल्हापूर : वीरशैव हा सनातन धर्म तर लिंगायत ही आचरणपद्धती त्याचे पर्यायीवाचक नाव आहे. हा धर्म वेदागमाला अनुसरून असल्याने त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे मोर्चाद्वारे वीरशैव-लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ घोषित करण्याची मागणी चुकीची आहे. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन जातीनिहाय आर्थिक दुर्बल घटकांना सोयी-सुविधा कशा मिळतील यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले, जाती धर्मात तेढ वाढवून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे उचित नाही. वीरशैव हा धर्म असून, त्यात गुरू-शिष्याला इष्टलिंग दीक्षा देतात, तेव्हा तू लिंगाधीन होऊन आपले जीवन व्यतित कर, असा उपदेश करतात. या आचरणपद्धतीचा अपभ्रंश होऊन ‘लिंगायत’ शब्दाची निर्मिती झाली आहे. त्यामुळेत्याला ‘स्वतंत्र धर्म’ म्हणता येत नाही. महात्मा बसवेश्वरांनीसुद्धा वीरशैव दीक्षा घेतली व त्याचा प्रचार केला. त्यांच्या कोणत्याच वचनात ‘लिंगायत’ शब्दाचा उल्लेख नसल्याने त्यांना ‘लिंगायत धर्माचे संस्थापक’ म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही.

आपल्या देशात जातीवर आधारित राखीव व्यवस्था चालत आली असून, वीरशैव लिंगायतमध्ये उपजीविकेसाठी केलेल्या उद्योगामुळे अनेक जाती निर्माण झाल्या. त्यातील काही जातींना आरक्षण मिळाले. ज्या पोटजातींना काहीही मिळाले नाही त्यांच्यासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. एका धर्मात फूट पाडून परस्पर संघर्ष केला तर काही लाभ होणार नाही. याशिवाय ‘अल्पसंख्याक’ म्हणून सुविधा घेतली तर या धर्मातील विविध जातींना मिळणाºया आरक्षणाच्या सवलती बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘वीरशैव वेगळा व लिंगायत वेगळा’ अशी फूट न पाडता संघटितपणे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सर्व पोटजातींना सवलत मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे ही काळाची गरज आहे.

अक्कमहादेवी मंडप येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर झालेल्या धर्मसभेत त्यांनीआशीर्वचन दिले. यावेळी शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर महाराज, शिवयोजी शिवाचार्य म्हैशाळकर महाराज, शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य मासोलीकर महाराज, महादेव महाराज हिंगणगावकर,श्रीधर पैलवान, आदी मान्यवर उपस्थित होते.