शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वीरशैव-लिंगायतला स्वतंत्र धर्माची मागणी चुकीची- चंद्रशेखर महास्वामीजी : सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:01 IST

कोल्हापूर : वीरशैव हा सनातन धर्म तर लिंगायत ही आचरणपद्धती त्याचे पर्यायीवाचक नाव आहे. हा धर्म वेदागमाला अनुसरून असल्याने त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे मोर्चाद्वारे वीरशैव-लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ घोषित करण्याची मागणी चुकीची आहे. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन जातीनिहाय आर्थिक दुर्बल घटकांना सोयी-सुविधा कशा मिळतील यासाठी केंद्राकडे ...

कोल्हापूर : वीरशैव हा सनातन धर्म तर लिंगायत ही आचरणपद्धती त्याचे पर्यायीवाचक नाव आहे. हा धर्म वेदागमाला अनुसरून असल्याने त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे मोर्चाद्वारे वीरशैव-लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्म’ घोषित करण्याची मागणी चुकीची आहे. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन जातीनिहाय आर्थिक दुर्बल घटकांना सोयी-सुविधा कशा मिळतील यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले, जाती धर्मात तेढ वाढवून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे उचित नाही. वीरशैव हा धर्म असून, त्यात गुरू-शिष्याला इष्टलिंग दीक्षा देतात, तेव्हा तू लिंगाधीन होऊन आपले जीवन व्यतित कर, असा उपदेश करतात. या आचरणपद्धतीचा अपभ्रंश होऊन ‘लिंगायत’ शब्दाची निर्मिती झाली आहे. त्यामुळेत्याला ‘स्वतंत्र धर्म’ म्हणता येत नाही. महात्मा बसवेश्वरांनीसुद्धा वीरशैव दीक्षा घेतली व त्याचा प्रचार केला. त्यांच्या कोणत्याच वचनात ‘लिंगायत’ शब्दाचा उल्लेख नसल्याने त्यांना ‘लिंगायत धर्माचे संस्थापक’ म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही.

आपल्या देशात जातीवर आधारित राखीव व्यवस्था चालत आली असून, वीरशैव लिंगायतमध्ये उपजीविकेसाठी केलेल्या उद्योगामुळे अनेक जाती निर्माण झाल्या. त्यातील काही जातींना आरक्षण मिळाले. ज्या पोटजातींना काहीही मिळाले नाही त्यांच्यासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. एका धर्मात फूट पाडून परस्पर संघर्ष केला तर काही लाभ होणार नाही. याशिवाय ‘अल्पसंख्याक’ म्हणून सुविधा घेतली तर या धर्मातील विविध जातींना मिळणाºया आरक्षणाच्या सवलती बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘वीरशैव वेगळा व लिंगायत वेगळा’ अशी फूट न पाडता संघटितपणे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सर्व पोटजातींना सवलत मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे ही काळाची गरज आहे.

अक्कमहादेवी मंडप येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर झालेल्या धर्मसभेत त्यांनीआशीर्वचन दिले. यावेळी शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर महाराज, शिवयोजी शिवाचार्य म्हैशाळकर महाराज, शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य मासोलीकर महाराज, महादेव महाराज हिंगणगावकर,श्रीधर पैलवान, आदी मान्यवर उपस्थित होते.