शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:23 IST

गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.

ठळक मुद्देकोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.सत्ताधारी भांडवलदारांचे हित जोपासत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. याप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. होणाऱ्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.किमान वेतन १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता, कंत्राटीकरण रद्द करा, मानधनी सेवेची पद्धत रद्द करा, मानधन नको-वेतन द्या, रेल्वे विमा संरक्षण खात्यात परदेशी गुंतवणूक धोरण रद्द करा आदी मागण्यांबाबत दूपारी टाऊन हॉल येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीने मोर्चास सुरुवात केली. ‘कामगार विरोधी मोदी सरकार’, ‘गरीब विरोधी मोदी सरकार’, ‘बेकारी वाढवणारे मोदी सरकार’ , ‘महागाई वाढवणारे मोदी सरकार ’ अशा घोषणा देत मोर्चेकरी सीपीआर चौक, दसरा चौक, सुभाष रोड, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौकमार्गे बिंदू चौकात मोर्चाची सांगता झाली.यावेळी अतुल दिघे म्हणाले, काही मालकांनी हा संप कामगारांनी करु नये म्हणून अडवणूकीची भुमिका घेतली. पण ; या कामगारांनी त्यांची दादागिरी जुगारुन या मोर्चात ते सहभागी झाले. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. केंद्र सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे यांनाच ‘अच्छे दिन’ आलेत.ते आम्हाला आलेले नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारने राबविलेली कामगार विरोधी धोरणे होय. आपल्या कामगार संघटनांनी दिल्लीत निवेदन दिल्यामुळे येथे आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले नाही.मोर्चात इंटक, आयटक, वर्कस फेडरेशन, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना, आशा वर्कस, भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग- ३ या संघटनांच्या प्रतिनिधींसह एस.बी.पाटील, बाबुराव तारळी, बी.एल.बरगे, नामदेव गावडे, डॉ. सुभाष जाधव, शाहीर सदाशिव निकम, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, आनंदराव परुळेकर, भगवान पाटील, प्रभाकर आरडे आदींचा सहभाग होता. दिलीप पवार यांनी आभार मानले.

धडकी भरणारा मोर्चा...मोर्चात शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत तसेच शालेय पोषण आहारमधील महिला, अंगणवाडी सेविका यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.त्यामुळे हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा होता,अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर