शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

कोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:23 IST

गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.

ठळक मुद्देकोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.सत्ताधारी भांडवलदारांचे हित जोपासत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. याप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. होणाऱ्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.किमान वेतन १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता, कंत्राटीकरण रद्द करा, मानधनी सेवेची पद्धत रद्द करा, मानधन नको-वेतन द्या, रेल्वे विमा संरक्षण खात्यात परदेशी गुंतवणूक धोरण रद्द करा आदी मागण्यांबाबत दूपारी टाऊन हॉल येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीने मोर्चास सुरुवात केली. ‘कामगार विरोधी मोदी सरकार’, ‘गरीब विरोधी मोदी सरकार’, ‘बेकारी वाढवणारे मोदी सरकार’ , ‘महागाई वाढवणारे मोदी सरकार ’ अशा घोषणा देत मोर्चेकरी सीपीआर चौक, दसरा चौक, सुभाष रोड, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौकमार्गे बिंदू चौकात मोर्चाची सांगता झाली.यावेळी अतुल दिघे म्हणाले, काही मालकांनी हा संप कामगारांनी करु नये म्हणून अडवणूकीची भुमिका घेतली. पण ; या कामगारांनी त्यांची दादागिरी जुगारुन या मोर्चात ते सहभागी झाले. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. केंद्र सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे यांनाच ‘अच्छे दिन’ आलेत.ते आम्हाला आलेले नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारने राबविलेली कामगार विरोधी धोरणे होय. आपल्या कामगार संघटनांनी दिल्लीत निवेदन दिल्यामुळे येथे आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले नाही.मोर्चात इंटक, आयटक, वर्कस फेडरेशन, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना, आशा वर्कस, भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग- ३ या संघटनांच्या प्रतिनिधींसह एस.बी.पाटील, बाबुराव तारळी, बी.एल.बरगे, नामदेव गावडे, डॉ. सुभाष जाधव, शाहीर सदाशिव निकम, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, आनंदराव परुळेकर, भगवान पाटील, प्रभाकर आरडे आदींचा सहभाग होता. दिलीप पवार यांनी आभार मानले.

धडकी भरणारा मोर्चा...मोर्चात शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत तसेच शालेय पोषण आहारमधील महिला, अंगणवाडी सेविका यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.त्यामुळे हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा होता,अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर