शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वारांगना, तृतीयपंथीयांचे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत

By admin | Updated: July 24, 2016 00:36 IST

रणजित मोरे : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या योजनेस प्रारंभ

कोल्हापूर : नियमन मुक्तीचा निर्णय घेतला; पण बाजार समित्यांमध्ये माल लावायचा कोठे? या समस्येमुळे शेतकरी गोंधळला असून, त्याला निराधार करू नका. जरा नजर ठेवा, समित्यांमधील मोकळ्या जागा मालासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला. ही अडचण सरकारच्या लक्षात आली असून, समित्यांसह शहरातील जागा अधिगृहीत करून त्या शेतकरी कट्ट्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे खोत यांनी सांगितले. राज्यमंत्री खोत यांनी शनिवारी सायंकाळी प्रा. पाटील यांच्या रुईकर कॉलनी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये बाजार समिती, शेतकरी, व्यापारी व सरकारची भूमिका यांवर सविस्तर चर्चा झाली. फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याबद्दल सरकारचे कौतुक करीत प्रा. पाटील म्हणाले, आता सरकारची जबाबदारी वाढली असून नवीन वाटेवरून जाताना शेतकरी गोंधळला आहे. समितीमध्ये माल लावायचा कोठे? विकायचा कसा? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. यासाठी समित्यांमधील मोकळ्या जागा त्यांच्यासाठी राखीव करून द्या. इतर राज्यांतील समित्यांमध्ये कशी व्यवस्था आहे, याच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, समित्यांमध्ये ‘शेतकरी कट्टा’ उभा करण्याचा मानस असल्याचे खोत यांनी सांगितले. मुंबईमधील सामाजिक, गृहनिर्माण संस्थांना शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी जागा देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यानुसार बोरीबंदर महापालिकेसह व मुंबई जिल्हा बॅँकेच्या ५३ शाखांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भगवान काटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेठरे धरणची सभा अन् उडदाचे ऊटेउभय नेत्यांची चर्चा रंगली असताना भाऊंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘बी. आर.’ मास्तरांच्या प्रचारासाठी आम्ही दोघे एकत्र होतो. डोंगर चढून रेठऱ्याकडे जाताना आमच्या आईने गूळ, शेंगा आणि उडदाचे ऊटे दिले होते. दाजी, तुम्हाला आठवते काय?’ असे भाऊंनी विचारले, यावर ‘उडदाच्या उट्याबरोबर वरण्याची भाजी ठरलेली असायची!’ असे हसत- हसत प्रा. पाटील यांनी उत्तर दिले. भीष्माचार्यांच्या दर्शनाने हत्तीचे बळप्रा. पाटील यांचे पाय धरून आशीर्वाद घेताना खोत म्हणाले, ‘दाजी हे चळवळींचे भीष्माचार्य आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे वाटत होते. आता त्यांच्या दर्शनाने सरकारमध्ये काम करताना हत्तीचे बळ येणार आहे. पण दाजी, तब्येतीकडे लक्ष द्या आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा.’ भाऊंचे डोळे पाणावले ! प्रा. पाटील यांची प्रकृती थोडी बिघडल्याने ते झोपून आहेत. भाऊ घरात येताच त्यांचे स्वागत सरोज पाटील (माई) यांनी केले. नमस्कार करताना ‘चांगलं काम कर रे बाबा’ असा आशीर्वाद मार्इंनी दिल्यानंतर भाऊंचे डोळे पाणावले...