शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

निवडणुकीत टीका; सत्तेसाठी मिठ्या

By admin | Updated: March 23, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद : तत्त्वांना तिलांजली; पाण्यात बघणाऱ्यांचे गळ्यात गळे

राजाराम लोंढे -- कोल्हापूर पंधरा दिवसांपूर्वी टोकाची ईर्ष्या करीत एकमेकांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा विडा उचललेल्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालत ‘सत्तेसाठी आम्ही कायपण करू’ हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेत्यांसह कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागतेच; पण ही जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळ्या वातावरणात झाली. पहिल्यांदाच भाजपने दोन्ही कॉँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण केलेच; पण मित्रपक्ष शिवसेना नेत्यांचीही भंबेरी उसळली. शाहूवाडी तालुक्यात भाजप-जनसुराज्य आघाडीविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी, पन्हाळ्यात जनसुराज्यविरोधात सर्वपक्षीय, हातकणंगलेत जनसुराज्य-भाजपविरोधात आघाड्या, शिरोळमध्ये भाजपविरोधात स्वाभिमानी, गडहिंग्लज व चंदगडमध्ये स्थानिक आघाड्या एकमेकांविरोधात, राधानगरी-भुदरगडमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांविरोधात उभ्या होत्या. या निवडणुकीत प्रचाराची राळ उडाली. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांचे शाब्दिक वस्त्रहरण करून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. भाजप-जनसुराज्यची आघाडी झाली; पण शिरोली मतदारसंघात विनय कोरे यांनी शौमिका महाडिक यांना कडवा विरोध केला. आमदार सुजित मिणचेकर यांनी तर या मतदारसंघात महाडिकविरोधात प्रचाराचे रान उठविले होते. महाडिक यांना घरी बसविण्याची भाषा करणारे मिणचेकर शौमिका महाडिक यांना सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यात पुढे राहिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शब्द देऊनही प्रकाश आवाडे यांनी ऐनवेळी दगा दिल्याने महादेवराव महाडिक यांनी इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीत आवाडे यांची सत्ता घालविली. आमदार सुरेश हाळवणकर व प्रकाश आवाडे पारंपरिक विरोधक, हे सगळे एकत्रित आले. गडहिंग्लज-चंदगडच्या राजकारणात जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील व डॉ. नंदा बाभूळकर हे एकमेकांचे विरोधक, तर शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपने खासदार राजू शेट्टी यांना रोखले. के. पी. पाटील व आमदार प्रकाश हे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत एकत्र आले. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे भाजपवर जहरी टीका करणारे खासदार राजू शेट्टीही पुन्हा भाजपसोबत गेले. एकंदरीत जि.प.च्या रणांगणात झालेले आरोप-प्रत्यारोप, त्यानंतर सत्तेसाठी नेत्यांनी मारलेल्या मिठ्या पाहून सामान्य माणूसही अचंबित झाला आहे. नरके यांनी ‘टायमिंग’ साधलीराहुल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचे दोन्ही कॉँग्रेसच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यात आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका निर्णायक ठरली. शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात असताना मोठे धाडस करून भाजपशी केलेली तडजोड व राजकीय मुत्सद्देगिरी दाखवीत आमदार नरके यांनी अचूक टायमिंग साधत टाकलेले पत्ते यशस्वी ठरले. माने यांची नम्रता व निष्ठाअध्यक्षपदासाठी गोळाबेरीज न झाल्याने शेवटच्या क्षणी ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांचे नाव नेत्यांनी पुढे केले. पराभव माहीत असताना कॉँग्रेस पक्षावरील निष्ठेपोटी नेत्यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी हसतमुखाने स्वीकारली. एवढेच नव्हे तर शौमिका महाडिक विजयी झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते सर्वांत पुढे होते.