शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:45 IST

literature Kolhapur- शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.

ठळक मुद्देसाहित्य आणि संस्कृती मंडळाकडून घोषणा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र घरपोच प्रदान होणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.राज्य शासनातर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत सन २०१९ या वर्षासाठी डॉ. शिंदे यांच्या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय-विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) या विभागातील पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये आहे. डॉ. शिंदे यांनी सन २०१९ मध्ये आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया हे पुस्तक लिहिले. त्यात आवर्त सारणीतील सर्व ११८ मूलद्रव्यांची माहिती आणि आवर्त सारणीचा इतिहास उलगडून मांडला आहे.

लेखक-दिग्दर्शक जत्राटकर यांना प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका) विभागातून पुरस्कार जाहीर झाला. त्याची रक्कम ५० हजार रुपये आहे. जत्राटकर यांचा हा पहिला एकांकिका संग्रह असून त्यातील एकांकिकांचे प्रयोग विविध स्पर्धांतून सादर झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून यंदा पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र हे साहित्यिकांना घरपोच प्रदान होणार असून पुरस्काराची रक्कम त्यांच्या बँकखात्यावर हस्तांतरित केली जाणार आहे.लोकमतमुळे पुस्तक साकारलेलोकमतमधील विज्ञान सदरातील धन्यवाद मेंडलीव या एका लेखाच्या माध्यमातून हे ४३६ पानांचे पुस्तक लिहिण्याचे बीज माझ्यामध्ये रुजले. त्यासह विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिज्ञासेचा त्यात मोठा भाग आहे. यापुढेही लिहीत राहण्यासाठी हा पुरस्कार ऊर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर