शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

उत्तूर ग्रामपंचायत जिल्हा स्मार्ट ग्राम

By admin | Updated: May 5, 2017 23:55 IST

ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी पुरस्कार स्वीकारला होता. जिल्हा स्मार्टमध्ये निवड झाल्याने ग्रा.पं.चे मनोबल उंचावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क --उत्तूर : दहा हजार लोकवस्ती असणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात निवड झाली. जिल्हा स्मार्ट ग्रामपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीचे मनोबल वाढले असून, गावच्या विकासास ४० लाखांचा निधी प्राप्त होईल. जिल्हा स्मार्ट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानुसार स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष ग्रामपंचायतीने पूर्ण केले होते. ग्रामपंचायतीची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या पथकाने पाहणी केली होती.जिल्ह्यात सर्वाधिक गुण ग्रामपंचायतीस मिळाल्याने जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाल्याचे उत्तूर ग्रामपंचायतीस कळविण्यात आले. निवड झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीने नुकताच तालुक्यात स्मार्ट गाव निवड झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सरपंच हर्षदा खोराटे, उपसरपंच धोंडिराम सावंत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी पुरस्कार स्वीकारला होता. जिल्हा स्मार्टमध्ये निवड झाल्याने ग्रा.पं.चे मनोबल उंचावले आहे. उत्तूर गाव जिल्हा स्मार्ट करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा, ग्रा. पं. चे पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य, पशुसंवर्धन विभाग, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. आता राज्यात उत्तूर गाव स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. - उमेश आपटे, जि.प. सदस्य. आतापर्यंत ग्रामपंचायतीने बारा पुरस्कार मिळविले. जिल्हा स्मार्टमध्ये गावची निवड झाल्याने गावच्या विकासास गती मिळणार आहे. याकामी जि. प.चे सदस्य उमेश आपटे, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. - हर्षदा खोराटे, सरपंच, उत्तूर.