शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उत्तूर ग्रामपंचायत जिल्हा स्मार्ट ग्राम

By admin | Updated: May 5, 2017 23:55 IST

ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी पुरस्कार स्वीकारला होता. जिल्हा स्मार्टमध्ये निवड झाल्याने ग्रा.पं.चे मनोबल उंचावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क --उत्तूर : दहा हजार लोकवस्ती असणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात निवड झाली. जिल्हा स्मार्ट ग्रामपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीचे मनोबल वाढले असून, गावच्या विकासास ४० लाखांचा निधी प्राप्त होईल. जिल्हा स्मार्ट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानुसार स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष ग्रामपंचायतीने पूर्ण केले होते. ग्रामपंचायतीची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या पथकाने पाहणी केली होती.जिल्ह्यात सर्वाधिक गुण ग्रामपंचायतीस मिळाल्याने जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाल्याचे उत्तूर ग्रामपंचायतीस कळविण्यात आले. निवड झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीने नुकताच तालुक्यात स्मार्ट गाव निवड झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सरपंच हर्षदा खोराटे, उपसरपंच धोंडिराम सावंत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी पुरस्कार स्वीकारला होता. जिल्हा स्मार्टमध्ये निवड झाल्याने ग्रा.पं.चे मनोबल उंचावले आहे. उत्तूर गाव जिल्हा स्मार्ट करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा, ग्रा. पं. चे पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य, पशुसंवर्धन विभाग, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. आता राज्यात उत्तूर गाव स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. - उमेश आपटे, जि.प. सदस्य. आतापर्यंत ग्रामपंचायतीने बारा पुरस्कार मिळविले. जिल्हा स्मार्टमध्ये गावची निवड झाल्याने गावच्या विकासास गती मिळणार आहे. याकामी जि. प.चे सदस्य उमेश आपटे, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. - हर्षदा खोराटे, सरपंच, उत्तूर.