शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ऊस परिषद २५ आॅक्टोबरला शक्य-- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मंत्री समितीने यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेबद्दल शेतकºयांना उत्सुकता आहे. ही परिषद २५ आॅक्टोबरच्यादरम्यान घेण्याचे संघटनेचे नियोजन आहे. दरम्यान, भागविकास निधीसाठी टनास ५० रुपये घेण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ...

ठळक मुद्दे भागविकास निधीस विरोध; पहिल्या हप्त्याचा आकडा मात्र फोडलेला नाहीसाधारणत: ६२० लाख टनच ऊस उपलब्ध होईल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मंत्री समितीने यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेबद्दल शेतकºयांना उत्सुकता आहे. ही परिषद २५ आॅक्टोबरच्यादरम्यान घेण्याचे संघटनेचे नियोजन आहे. दरम्यान, भागविकास निधीसाठी टनास ५० रुपये घेण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. संघटनेने अजून पहिल्या हप्त्याचा आकडा मात्र फोडलेला नाही.

संघटनेची भात परिषद १ आॅक्टोबरला बांबवडे येथे होत आहे. तिथेही ऊस परिषदेबाबत चर्चा अपेक्षित आहे. आमच्या पहिल्या हप्त्याचा प्रश्न सोडवा आणि हंगाम कधीही सुरू करा, असा संघटनेचा पवित्रा आहे. मंत्री समितीने शेतकºयांकडून भागविकास निधी म्हणून प्रतिटन ३ टक्के किंवा टनास जास्तीत जास्त ५० रुपये घेण्यास मंजुरी दिली आहे. जीएसटी लागू झाल्याने ऊस खरेदी कर रद्द झाला आहे म्हणून सरकार ही रक्कम शेतकºयांच्या खिशातून काढून घेत असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘सरकारने दोनचाकी ट्रॉलीस १९ हजार अणि चारचाकीस ९२ हजार रुपये जीएसटी लावला आहे. या वाहनांचा वापर हा शेतकºयांच्याच ऊस वाहतुकीसाठी होतो. असे असताना परत त्याच्याकडून सरकार भागविकास निधी म्हणून पैसे उकळत आहे. त्यास आमचा तीव्र विरोध राहील. सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्ही न्यायालयातही जाऊ.’नोव्हेंबरपासून हंगाम सोयीचाचदिवाळी २१ आॅक्टोबरला संपते. त्यामुळे हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास कुणाचीच अडचण नाही. त्याच्या अगोदर कर्नाटकातील कारखानेही सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे. दिवाळी झाल्याशिवाय ऊस तोडणी मजूर येत नाहीत. यंदा सरकारने ७२२ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस नाही. साधारणत: ६२० लाख टनच ऊस उपलब्ध होईल, असा या उद्योगाशी संबंधित जाणकारांचा अंदाज आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात यंदा ऊस जास्त आहे. त्यामुळे हंगाम एक नोव्हेंबरला सुरू झाला तरी तो मार्चपर्यंत संपेल. त्यामुळे शिल्लक उसाचाही प्रश्न नाही. आता सुरू असलेल्या पावसामुळे उसाचे वजन वाढणार हे मात्र नक्की आहे.