शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रदूषणमुक्त रंकाळ्याचा प्रयोग फुस्स!

By admin | Updated: October 31, 2014 01:09 IST

सांडपाणी वळविण्यात अपयश : चार वर्षे, साडेआठ कोटी खर्चून केलेल्या ड्रेनेजलाईनच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह

भारत चव्हाण - कोल्हापूरप्रदूषित पाण्यामुळे मरणयातना भोगत असलेल्या रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यासाठी चार वर्षे आणि साडेआठ कोटी रुपयांचा निधी खर्च करून भूमिगत ड्रेनेज लाईन टाकली खरी; परंतु केवळ प्रशासनाच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आजही आठ ते दहा दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाणी रंकाळा तलावात थेट मिसळत आहे. एवढा मोठा खर्च करूनही हा प्रकल्प अयशस्वी झाल्याचेच त्यातून स्पष्ट झाले आहे.कळंबा जेल परिसर, नाळे कॉलनी, संभाजीनगर, मोहिते कॉलनी, साळोखेनगर, आपटेनगर, साळोखे पार्क, संतोष कॉलनी, तुळजाभवानी वसाहत, गणेश कॉलनी, राजलक्ष्मीनगर, पांडुरंगनगरी या परिसरातील सांडपाणी एका ओढ्याद्वारे शाम हौसिंग सोसायटीजवळून थेट रंकाळा तलावात मिसळते. तब्बल आठ ते दहा दशलक्ष लिटर प्रतिदिन मैलामिश्रित सांडपाणी रंकाळा तलावाचे पाणी दुर्गंधीयुक्त करून टाकत आहे. हे सांडपाणी वळवून ते दुधाळी नाल्यापर्यंत वाहून नेण्यासाठी ९०० एमएम जाडीची मोठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेकडे पाठविला होता. केंद्र सरकारकडून मिळालेल्या साडेआठ कोटींच्या निधीतून हे कामही हाती घेण्यात आले. तब्बल चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर गेल्या चार महिन्यांपूर्वी ते पूर्ण झाले. मात्र, थेट तलावात आजही सांडपाणी मिसळतेच आहे. कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा शाम हौसिंग सोसायटीजवळ दगडी बंधारा बांधून सांडपाणी अडविण्यात आले आहे. त्या ठिकाणी सतरा लाख रुपये खर्च करून एक ईडी वर्क करण्यात आले. बंधाऱ्याला तटलेले सांडपाणी शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर या मार्गावर टाकलेल्या ड्रेनेज लाईनला जोडले आहे; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून बंधाऱ्याला फळ्याच जोडलेल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी ओढ्यातूनच पुढे तलावात मिसळते. आज, गुरुवारी सकाळीही हीच स्थिती होती. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेचे रंकाळ्याचे आयुष्य अंधकारमय बनले आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. सर्वांत कठीण काम केले पूर्ण शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर या तीन किलोमीटर मार्गावर भूमिगत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम एक वर्षात पूर्ण करायचे होते; परंतु टणक लागलेली जमीन, ब्लास्टिंगचा वापर, अनेक जलवाहिन्यांचा अडसर, ड्रेनेज लाईनचे क्रॉसिंग अशा विविध कठीण कामांमुळे तब्बल साडेतीन वर्षे हे काम लांबले. पालिकेच्या इतिहासातील सर्वांत अवघड काम म्हणून याकडे पाहिले गेले. काम घेतलेल्या ठेकेदाराच्या नाकी चांगलाच दम आला. मनपाचे अधिकारीही ‘कधी एकदा काम होतंय’ असे म्हणत होते. इतक्या अडचणीतून काम पूर्ण केल्यानंतरही जर अधिकारी आणि कर्मचारी हलगर्जीपणा करीत असतील आणि सांडपाणी तलावात मिसळत असेल तर त्याला काय म्हणायचे? परतीच्या पावसाचे कारणमहापालिकेचे अधिकारी अवकाळी पावसाचे कारण देत आहेत. पावसाचे पाणी रोखण्याची क्षमता या ड्रेनेज लाईनमध्ये नाही, असा त्यांचा दावा आहे. परंतु, पाऊस संपला तरीही थेट तलावात पाणी मिसळते, त्याला कोण जबाबदार? याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. परंतु, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तयांनी मात्र त्याचे उत्तर शोधून उपाययोजना राबविली पाहिजे. कामच चुकीचे झाल्याचा संशय शाम हौसिंग सोसायटी येथून सांडपाणी वळविण्याचे कामच चुकीचे झाल्याचा संशय बळावला आहे. सुरुवातीला या कामाची चाचणी घेण्यात आली त्यावेळी या ड्रेनेज लाईनमधून सांडपाणी पुढे सरकत नव्हते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम करताना ड्रेनेज लाईनमध्ये दगड-माती अडकली असण्याची शक्यता व्यक्त करीत वेळ मारून नेली. दगड-माती काढण्यातही काही दिवस घालविले; परंतु त्यानंतर तरी अद्याप पूर्ण क्षमतेने सांडपाणी वाहून गेल्याचे कधीच निदर्शनास आले नाही. ओढ्याच्या प्रवाहाला बंधारा घालून रोखल्यानंतर नव्वद अंशांच्या काटकोनात हे पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यास पुरेसा दाब मिळत नाही. त्यामुळे सांडपाणी ड्रेनेज लाईनमधून कमी जाते आणि बंधारा ‘ओव्हरफ्लो’ होऊन तलावात जादा मिसळते. म्हणूनच तांत्रिक पातळीवरही या कामाची चौकशी तसेच तपासणी होण्याची आवश्यकता आहे.