शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मंत्रिपदाचा उपयोग समाजकारणासाठी करा

By admin | Updated: November 1, 2015 00:59 IST

हसन मुश्रीफ : मौजे सांगाव येथे रस्ते बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांतदादांवर टीका

कागल : आजपर्यंत जे जे बांधकाममंत्री या महाराष्ट्रात झाले, त्यांनी आपण ज्या शहरातून अथवा भागातून आलो, त्या त्या शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी देऊन मोठा विकास घडविला आहे. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यास एकमात्र अपवाद आहेत. मंत्रिपदाचा वापर ते फक्त राजकारण करण्यासाठीच करीत आहेत. चंद्रकांतदादा... मंत्रिपदाचा थोडातरी उपयोग सामजकारणासाठी करा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. मौजे सांगाव येथे आयोजित रस्ते बांधकामाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील (बापू) होते. कार्यक्रमास भैया माने, शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज अर्जुना पाटील, मंडलिक कारखान्याचे संचालक शंकर व्यंकू पाटील, सरपंच स्वाती पाटील, वंदना पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले, सर्वाजनिक बांधकाम खाते मंत्रिपदासारखे महत्त्वपूर्ण खाते असताना कोणताच भरीव निधी ते कोल्हापूरसाठी आणू शकत नाहीत, हे करवीरकरांचे दुर्दैव आहे. पालकमंत्री म्हणून कोणतीच भूमिका ते घेत नाहीत. मग जिल्ह्यातील जनतेला तुमच्या मंत्रिपदाचा उपयोग काय? यापुढे तरी त्यांनी निव्वळ राजकारण न करता समाजकारणाला महत्त्व द्यावे. राज्य शासनात ताळमेळ नाही. ‘कोण म्हणतो पंजा मारतो, कोण म्हणतो दात मोजतो’. जनतेकडे त्यांचे लक्ष नाही. हे सरकार टिकेल की नाही, अशी परिस्थिती झाली आहे. कागल-गडहिंग्लज मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी त्यांनी क. सांगाव ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत, क. सांगाव ते सुळकूड रस्त्यासाठी ३0 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. युवराज पाटील म्हणाले, मंत्रिपदावर असताना आमदार मुश्रीफ यांनी प्रचंड निधी मतदारसंघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला. आता ते प्रभावी विरोधी पक्षाचे काम करीत आहेत. विकासकामासाठी निधी खेचून आणण्याची धमक त्यांच्यात असल्याने आता हा दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. बाजार समितीचे संचालक कृष्णात पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संजय हेगडे, राजेंद्र माने, विजयसिंह पाटील, कल्लेश माळी, अरुण पाटील, रावसाहेब मगदूम, विक्रमसिंह माने, इनायत मुल्ला, आदी उपस्थित होते. नंदकुमार पाटील यांनी आभार मानले.