शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसी प्रवेशामध्ये राज्य शासनाकडून उफराटी नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

विश्र्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यभरातील सुमारे ६० हजारांहून अधिक तरुणांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या फार्मसी पदविका व ...

विश्र्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यभरातील सुमारे ६० हजारांहून अधिक तरुणांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या फार्मसी पदविका व पदवी प्रवेशाचा घोळ राज्य शासनाकडून सुरू आहे. अगोदर पदविका व नंतर पदवीचा प्रवेश निश्चित करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ही पद्धत चुकीची असल्याचे पालक व संस्थाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही अस्वस्थता आहे. पदविका प्रवेश अगोदर निश्चित केल्यास या विद्यार्थ्यांना पदवीसाठीच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती आहे.

पदविका प्रवेशासाठी ८ जानेवारीची अंतिम मुदत आहे. पदवीसाठी ११ जानेवारीस गुणवत्ता यादी लागणार असून १२ ते १४ जानेवारीदरम्यान पहिल्या फेरीचा कॅप राऊंड आहे. पदविका प्रवेशासाठी राज्यात ४० हजार जागा असून सुमारे ८० हजार अर्ज येतात. पदवीसाठी २० हजार जागा असून त्यासाठीही वर्षाला सरासरी ५० हजार अर्ज येतात. तंत्रशिक्षण संचालकांतर्फे ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना मुख्यत: पदविका घेऊन दुकान सुरू करायचे असते ते विद्यार्थी बारावीनंतर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यावर्षी पदविकेचे प्रवेश अगोदर बंद होणार असल्याने ज्यांना पदवीला प्रवेश हवा आहे ते विद्यार्थी साशंकतेपोटी पदविका अभ्यासक्रमांसाठीही वळले आहेत. पदवीसाठी प्रवेश मिळालाच नाही तर काय या भीतीपोटी हे विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाकडे वळल्याने पदविका अभ्यासक्रमांतील स्पर्धा तीव्र होणार आहे. याउलट ज्यांना नंतर पदवीसाठी प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्यांचे पदविकाचे प्रवेश नंतर रद्द होतील व त्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रवेश घेता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया बदलून अगोदर पदवीचे प्रवेश निश्चित करावेत, अशी मागणी विद्यार्थी-पालक व संस्थाचालकांतूनही होत आहे.

------------------------------------------

प्राधान्यक्रम असेही..

पदविकासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांत मुख्यत: ज्यांना स्वत:चे दुकान सुरू करायचे आहे, एम.आर. औषध कंपन्यांमध्ये नोकरी हे प्राधान्यक्रम असतात. पदवीच्या विद्यार्थ्यांचे औद्योगिक कंपन्या, संशोधन व शिक्षणक्षेत्रात हे प्राधान्यक्रम असतात. त्यातील काहीच नाही जमले तरच तो शेवटी दुकान सुरू करण्याचा विचार करतो.