शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

हरपवडे ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध

By admin | Updated: July 24, 2015 00:41 IST

विकासाचे ध्येय : सलग १३ वेळा बिनविरोध करून राज्यात विक्रम

म्हासुर्ली : एकीचे बळ, पूर्वजांनी घालून दिलेले आदर्श आणि गावाच्या विकासाचे ध्येय या त्रिसूत्रीच्या जोरावर धामणी खोऱ्यातील हरपवडे (ता. पन्हाळा) या छोट्याशा गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामपंचायत स्थापनेपासून सलग १३ वेळा बिनविरोध करून राज्यात एक विक्रम केला आहे.हरपवडे हे धामणी खोऱ्यातील छोटेसे गाव. हरपवडे आणि निवाचीवाडी अशा या ग्रूप ग्रामपंचायतीची १९५६ ला स्थापना झाली. प्रथम सरपंच म्हणून कै. मारुती सुभाना चौगले यांनी काम केले. त्यानंतर सलग २० वर्षे कै. देमजी भवाना चौगले यांनी गावाची धुरा सांभाळली. गावाच्या एकीच्या बळावरच प्रत्येक निवडणुक ीवेळी मंदिरात ग्रामसभा घेऊन त्यातच प्रत्येक सदस्याची निवड करण्याची परंपरा सुरुवातीच्या काळातच सुरू झाली आणि त्याचे पालनही आताची पिढी तितक्याच आत्मीयतेने करीत आहे. सुरुवातीच्या काळात वीज व पाणीपुरवठा, सातवीपर्यंत शाळा असा गावाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर कै. श्रीपती चौगले, कै . हरी चौगले, मंगल सुतार, अलका चौगले, महादेव कांबळे, संजय गुरव यांच्या सरपंचपदाच्या काळात गावाने एकीच्या जोरावर प्रगती केली. या गावाने आतापर्यंत तालुक्यातील पहिले तंटामुक्त गाव होण्याचा मान मिळविला. लोकवर्गणीतून समृद्घ शाळेने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळविला. केंद्र सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कारही मिळविला. या गावातील व शाळेतील अनेकांनी आयुक्त, न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, तंत्रज्ञ अशी मानाची पदे पादाक्रांत केली आहेत.या गावाने आजपर्यंत सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करूनही शासन स्तरावर या गावास बेदखल केले आहे. गावास आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे गाव विकासापासून वंचित आहे. आजही या गावास स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित नाही. मंदिरासह शाळा, अंगणवाडी, पाणीयोजना, सभागृहासाठी निधी मिळाला; मात्र गावची दखल सरकारी पातळीवर घेत नसल्याबद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयासाठी भरघोस निधी मिळून प्रशस्त ग्रामसचिवालय उभारण्याची मागणी तसेच अंतर्गत रस्ते, गटर्स, सुसज्ज ग्रंथालय व धामणी नदीवर घाट, समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)खास बाब म्हणून निधी मिळावा खासदार महाडिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे या बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी दहा लाखांचा निधी मिळावा, सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करणाऱ्या या गावास जिल्हा नियोजन मंडळाने खास बाब म्हणून निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.