शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

हरपवडे ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध

By admin | Updated: July 24, 2015 00:41 IST

विकासाचे ध्येय : सलग १३ वेळा बिनविरोध करून राज्यात विक्रम

म्हासुर्ली : एकीचे बळ, पूर्वजांनी घालून दिलेले आदर्श आणि गावाच्या विकासाचे ध्येय या त्रिसूत्रीच्या जोरावर धामणी खोऱ्यातील हरपवडे (ता. पन्हाळा) या छोट्याशा गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामपंचायत स्थापनेपासून सलग १३ वेळा बिनविरोध करून राज्यात एक विक्रम केला आहे.हरपवडे हे धामणी खोऱ्यातील छोटेसे गाव. हरपवडे आणि निवाचीवाडी अशा या ग्रूप ग्रामपंचायतीची १९५६ ला स्थापना झाली. प्रथम सरपंच म्हणून कै. मारुती सुभाना चौगले यांनी काम केले. त्यानंतर सलग २० वर्षे कै. देमजी भवाना चौगले यांनी गावाची धुरा सांभाळली. गावाच्या एकीच्या बळावरच प्रत्येक निवडणुक ीवेळी मंदिरात ग्रामसभा घेऊन त्यातच प्रत्येक सदस्याची निवड करण्याची परंपरा सुरुवातीच्या काळातच सुरू झाली आणि त्याचे पालनही आताची पिढी तितक्याच आत्मीयतेने करीत आहे. सुरुवातीच्या काळात वीज व पाणीपुरवठा, सातवीपर्यंत शाळा असा गावाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर कै. श्रीपती चौगले, कै . हरी चौगले, मंगल सुतार, अलका चौगले, महादेव कांबळे, संजय गुरव यांच्या सरपंचपदाच्या काळात गावाने एकीच्या जोरावर प्रगती केली. या गावाने आतापर्यंत तालुक्यातील पहिले तंटामुक्त गाव होण्याचा मान मिळविला. लोकवर्गणीतून समृद्घ शाळेने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळविला. केंद्र सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कारही मिळविला. या गावातील व शाळेतील अनेकांनी आयुक्त, न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, तंत्रज्ञ अशी मानाची पदे पादाक्रांत केली आहेत.या गावाने आजपर्यंत सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करूनही शासन स्तरावर या गावास बेदखल केले आहे. गावास आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे गाव विकासापासून वंचित आहे. आजही या गावास स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित नाही. मंदिरासह शाळा, अंगणवाडी, पाणीयोजना, सभागृहासाठी निधी मिळाला; मात्र गावची दखल सरकारी पातळीवर घेत नसल्याबद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयासाठी भरघोस निधी मिळून प्रशस्त ग्रामसचिवालय उभारण्याची मागणी तसेच अंतर्गत रस्ते, गटर्स, सुसज्ज ग्रंथालय व धामणी नदीवर घाट, समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)खास बाब म्हणून निधी मिळावा खासदार महाडिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे या बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी दहा लाखांचा निधी मिळावा, सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करणाऱ्या या गावास जिल्हा नियोजन मंडळाने खास बाब म्हणून निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.