शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जिल्हा परिषदेकडून झाडांची विनापरवाना कत्तल

By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST

दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूर : जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या कागलकर हाऊसच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या १३ विविध प्रकारच्या झाडांची कत्तल जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. यातील दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली आहे. जिल्हा परिषद प्रशासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत असते. तसेच वृक्षलागवडीला प्रोत्साहनही देत असते; पण कागलकर हाऊसच्या आवारातील पाच काटेरी बाभूळ, पटना कॅशिया चार, सुबाभूळ दोन, विलायत चिंच व करंज प्रत्येकी एक अशा तेरा झाडांवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कुऱ्हाड चालविली आहे. बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याचे कळताच देसाई यांनी महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्या माध्यमातून पंचनामा केला. विनापरवाना तोडलेली झाडे पंचगंगा स्मशानभूमीत जप्त करून घेऊन जाणे अपेक्षित होते; परंतु एका रात्रीत तोडलेली सुमारे दहा टन वजनाची झाडे गायब झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या या कारभाराबद्दल पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. नागाळा पार्कात १०० झाडांची कत्तल : प्रजासत्ताकनागाळा पार्क येथील नागोबा देवालयाशेजारील रि.स.नं २४९ मधील १०० झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणने काल, बुधवारी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस प्रवीणसिंहराजे घाटगे यांना बजावली. याबाबत ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी लेखी तक्रार केली होती. काल नागाळा पार्क येथील १०० वृक्षांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी प्राधिकरणाकडे देसाई यांनी तक्रार केली. यामध्ये कॉरिया ९० व वर्डचेरीच्या १० झाडांचा समावेश आहे. यानुसार घाटगे यांना प्राधिकरणाने महाराष्ट्र (नागरी) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.