शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

जिल्हा परिषदेकडून झाडांची विनापरवाना कत्तल

By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST

दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूर : जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या कागलकर हाऊसच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या १३ विविध प्रकारच्या झाडांची कत्तल जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. यातील दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली आहे. जिल्हा परिषद प्रशासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत असते. तसेच वृक्षलागवडीला प्रोत्साहनही देत असते; पण कागलकर हाऊसच्या आवारातील पाच काटेरी बाभूळ, पटना कॅशिया चार, सुबाभूळ दोन, विलायत चिंच व करंज प्रत्येकी एक अशा तेरा झाडांवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कुऱ्हाड चालविली आहे. बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याचे कळताच देसाई यांनी महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्या माध्यमातून पंचनामा केला. विनापरवाना तोडलेली झाडे पंचगंगा स्मशानभूमीत जप्त करून घेऊन जाणे अपेक्षित होते; परंतु एका रात्रीत तोडलेली सुमारे दहा टन वजनाची झाडे गायब झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या या कारभाराबद्दल पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. नागाळा पार्कात १०० झाडांची कत्तल : प्रजासत्ताकनागाळा पार्क येथील नागोबा देवालयाशेजारील रि.स.नं २४९ मधील १०० झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणने काल, बुधवारी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस प्रवीणसिंहराजे घाटगे यांना बजावली. याबाबत ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी लेखी तक्रार केली होती. काल नागाळा पार्क येथील १०० वृक्षांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी प्राधिकरणाकडे देसाई यांनी तक्रार केली. यामध्ये कॉरिया ९० व वर्डचेरीच्या १० झाडांचा समावेश आहे. यानुसार घाटगे यांना प्राधिकरणाने महाराष्ट्र (नागरी) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.