शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ घेणार प्रथम वर्षाच्या परीक्षा!

By admin | Updated: August 26, 2015 00:41 IST

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय : कॅम्पसमध्ये फोर-जी नेटवर्कद्वारे वाय-फाय सुविधा

कोल्हापूर : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)कडील परीक्षाविषयक कामकाजाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील सर्व प्रथम वर्षाच्या परीक्षांचे कामकाज विद्यापीठ यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णय विद्यापीठाने मंगळवारी घेतला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.विद्यापीठ कार्यालयात दुपारी एक वाजता कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. यावेळी फोर-जी नेटवर्कद्वारे विद्यापीठाचा कॅम्पस वाय-फाय सुविधायुक्त करण्यास मान्यता दिली. तंत्रज्ञान आणि विज्ञानप्रसाराच्या आनुषंगाने सोलर एनर्जी पार्क, सायन्स सेंटर, सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी पार्क व रुरल टेक्नॉलॉजी पार्क तयार करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. विद्यापीठातील सर्व प्रथम वर्ष परीक्षांचे कामकाज विद्यापीठ यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णय झाला. विद्यापीठातील वर्ग एक ते चारचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबतच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली. भारतीय विश्वविद्यालय संघ आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात नोव्हेंबर २०१५ मध्ये पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद आयोजित करण्यास मान्यता दिली. दरम्यान, व्यवस्थापन परिषदेचा कार्यकाळ ३१ आॅगस्टला संपुष्टात येत असल्याने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सदस्यांचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रताप माने, डॉ. पी. एस. पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)अधिकार राहणार का?महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४च्या अंमलबजावणीसाठी १९९५ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्याकडे अधिकार होते. त्यामुळे आता नवा कायदा होईपर्यंत विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सर्व अधिकार राहणार का? अथवा सध्याच्या अधिकार मंडळांना मुदतवाढ मिळणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे.अधिकार मंडळांच्या निवडणुका मार्च २०१६ पर्यंत लांबणीवरप्रचलित महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ याला दोन दशके पूर्ण झाली आहेत. खुल्या अर्थव्यवस्थेची धोरणे, जागतिकीकरण, उदारीकरण, बहुतांश भारतीय सेवेत रुजू होत आहेत. त्यामुळे प्रचलित विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षण व व्यवस्था यांचे सुयोग्य प्रशासन व नियंत्रण याबाबत आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा विचार करून डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मध्ये बदल करण्याबाबत ‘महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट’चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यासह अन्य काही नव्या सूचनांचा विचार करून राज्य सरकार विद्यापीठाचा नवीन कायदा डिसेंबरदरम्यान होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करणार आहे. त्यामुळे आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांसाठीच्या निवडणुकांवर खर्च होऊ नये. यासाठी सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे विधेयक मंजूर केले आहे. शिवाय मार्च २०१६ पर्यंत अधिकार मंडळांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. हा आदेश विद्यापीठाला मंगळवारी ‘ई-मेल’द्वारे प्राप्त झाला.