शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांची हजेरी वायरलेस यंत्रावर

By admin | Updated: March 23, 2017 00:22 IST

विद्यार्थ्यांनीच केले संशोधन : गैरहजर राहिल्यास पालकांच्या मोबाईलवर मेसेज

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --विद्यापीठ स्तरावर प्रत्येक लेक्चरला विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. यासाठी हजेरीपत्रक तयार करणे, त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांच्या सह्या घेणे, ते पत्रक वर्षभर जपून ठेवणे या गोष्टी खूप किचकट व वेळखाऊ आहेत. या पद्धतीला आधुनिकतेची जोड देत शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘वायरलेस हजेरी यंत्र’ बनविले आहे. विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील एम. एस्सी. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ओमकार सणगर, नितीन गुडाळे, अक्षय डोर्ले या विद्यार्थ्यांनी प्रा. कबीर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन महिन्यांमध्ये ‘वायरलेस अटेंडन्स सिस्टीम’ हे यंत्र तयार केले आहे. ते संगणकाशी जोडले गेले आहे. त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या बोटांचे ठसे घेऊन त्या विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांक यांची संगणकावर नोंद केली जाणार आहे. हे यंत्र हलके व लहान असल्याने प्राध्यापक आपल्या लेक्चरला हे यंत्र वर्गात घेऊन जातील. वर्गातील विद्यार्थी या यंत्रावर बायोमेट्रिकप्रमाणे हजेरी लावतील. लेक्चर संपल्यानंतर प्राध्यापक हे यंत्र वर्गातून परत नेतील. एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याच्या पालकांच्या मोबाईलवर ‘तुमचा पाल्य संबंधित तासाला गैरहजर आहे,’ हा मेसेजही पाठविण्याची सुविधा या यंत्रात आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रत्येक लेक्चरची हजेरी कागदावर सही घेऊन घेतली जाते. काही विद्यार्थी लेक्चरला न बसता यावर सही करीत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.विद्यार्थ्यांनी या हजेरी यंत्राची निर्मिती केली आहे. या प्रणालीमुळे हजेरीबाबत होणाऱ्या अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे. -प्रा. कबीर खराडे,संगणकशास्त्र विभाग,वायरलेस अटेंडन्स सिस्टीमचे फायदे संपूर्णपणे स्वयंचलितवायरलेस यंत्रअचूक हजेरीगैरप्रकार टाळता येतो.३०० फुटांपर्यंत या प्रणालीचा वापर करता येतो.डेटाबेस बॅकअप गैरहजेरीचा मेसेज पालकांना पाठविता येतो.मोबाईल बॅटरीप्रमाणे हे यंत्र चार्ज करता येते.कागदाची बचत