शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने स्वीकारले १५५ गावांचे पालकत्व

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

‘मुनिजन’ योजनेअंतर्गत करणार विकास

संतोष मिठारी / कोल्हापूर विविध विद्याशाखांद्वारे शिक्षण देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १५५ गावांचे पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधीलकीचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठाने ‘मुनिजन’ (महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज न्यू इनिशिएटीव्हज जॉइंट अ‍ॅक्शन नाऊ) योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून लोकसहभागातून विकास साधण्यासाठी संंबंधित गावे दत्तक घेतली आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या मदतीने श्रमदानातून या गावांमध्ये बंधाऱ्यांची उभारणी, वृक्षारोपणाची कामे पूर्ण केली आहेत. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एनएसएस संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून एक गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या या गावांमध्ये लोकसहभागातून विकास साधला जाणार आहे. त्यासह श्रमदानातून या गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या १५५ गावांमध्ये विद्यापीठाने जानेवारी २०१६ पासून कामाला सुरुवात केली. याठिकाणी ‘एनएसएस’च्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जलसंधारणासाठी एकूण २० बंधाऱ्यांच्या उभारणी केली आहे. त्यासह वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा, पाणी आणि मातीपरीक्षण केले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धनाबाबत प्रबोधनाचे उपक्रम राबविले आहेत. श्रमदानासह प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी गेल्या सहा महिन्यांत ‘एनएसएस’च्या १२ हजार स्वयंसेवकांनी काम केले आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांच्या विकासाचा प्राथमिक आराखडे तयार केले आहेत. यामध्ये संबंधित गावांमधील शिक्षण, आरोग्य, पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, आदींच्या नियोजनाचा समावेश आहे. यासाठी ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले आहे. हे आराखडे मान्यतेसह पुढील कार्यवाहीसाठी शासनाला सादर केले आहेत. स्वयंपूर्ण गाव साकारणार ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत ‘एनएसएस’च्या माध्यमातून संबंधित गावे स्वयंपूर्ण, परिपूर्ण केली जाणार आहेत. शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावांचा विकास साधला जाणार असल्याचे विद्यापीठाचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची मूल्ये रुजविण्याचा विद्यापीठाचा उद्देशही सफल होईल. वर्षभरात महाविद्यालयांतील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा बनविला आहे. जिल्हानिहाय दत्तक गावे 62 कोल्हापूर 48 सांगली 45 सातारा