शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

विद्यापीठाने स्वीकारले १५५ गावांचे पालकत्व

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

‘मुनिजन’ योजनेअंतर्गत करणार विकास

संतोष मिठारी / कोल्हापूर विविध विद्याशाखांद्वारे शिक्षण देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १५५ गावांचे पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधीलकीचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठाने ‘मुनिजन’ (महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज न्यू इनिशिएटीव्हज जॉइंट अ‍ॅक्शन नाऊ) योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून लोकसहभागातून विकास साधण्यासाठी संंबंधित गावे दत्तक घेतली आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या मदतीने श्रमदानातून या गावांमध्ये बंधाऱ्यांची उभारणी, वृक्षारोपणाची कामे पूर्ण केली आहेत. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एनएसएस संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून एक गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या या गावांमध्ये लोकसहभागातून विकास साधला जाणार आहे. त्यासह श्रमदानातून या गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या १५५ गावांमध्ये विद्यापीठाने जानेवारी २०१६ पासून कामाला सुरुवात केली. याठिकाणी ‘एनएसएस’च्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जलसंधारणासाठी एकूण २० बंधाऱ्यांच्या उभारणी केली आहे. त्यासह वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा, पाणी आणि मातीपरीक्षण केले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धनाबाबत प्रबोधनाचे उपक्रम राबविले आहेत. श्रमदानासह प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी गेल्या सहा महिन्यांत ‘एनएसएस’च्या १२ हजार स्वयंसेवकांनी काम केले आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांच्या विकासाचा प्राथमिक आराखडे तयार केले आहेत. यामध्ये संबंधित गावांमधील शिक्षण, आरोग्य, पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, आदींच्या नियोजनाचा समावेश आहे. यासाठी ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले आहे. हे आराखडे मान्यतेसह पुढील कार्यवाहीसाठी शासनाला सादर केले आहेत. स्वयंपूर्ण गाव साकारणार ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत ‘एनएसएस’च्या माध्यमातून संबंधित गावे स्वयंपूर्ण, परिपूर्ण केली जाणार आहेत. शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावांचा विकास साधला जाणार असल्याचे विद्यापीठाचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची मूल्ये रुजविण्याचा विद्यापीठाचा उद्देशही सफल होईल. वर्षभरात महाविद्यालयांतील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा बनविला आहे. जिल्हानिहाय दत्तक गावे 62 कोल्हापूर 48 सांगली 45 सातारा