शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

विद्यापीठाने स्वीकारले १५५ गावांचे पालकत्व

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

‘मुनिजन’ योजनेअंतर्गत करणार विकास

संतोष मिठारी / कोल्हापूर विविध विद्याशाखांद्वारे शिक्षण देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १५५ गावांचे पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधीलकीचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठाने ‘मुनिजन’ (महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज न्यू इनिशिएटीव्हज जॉइंट अ‍ॅक्शन नाऊ) योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून लोकसहभागातून विकास साधण्यासाठी संंबंधित गावे दत्तक घेतली आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या मदतीने श्रमदानातून या गावांमध्ये बंधाऱ्यांची उभारणी, वृक्षारोपणाची कामे पूर्ण केली आहेत. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एनएसएस संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून एक गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या या गावांमध्ये लोकसहभागातून विकास साधला जाणार आहे. त्यासह श्रमदानातून या गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या १५५ गावांमध्ये विद्यापीठाने जानेवारी २०१६ पासून कामाला सुरुवात केली. याठिकाणी ‘एनएसएस’च्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जलसंधारणासाठी एकूण २० बंधाऱ्यांच्या उभारणी केली आहे. त्यासह वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा, पाणी आणि मातीपरीक्षण केले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धनाबाबत प्रबोधनाचे उपक्रम राबविले आहेत. श्रमदानासह प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी गेल्या सहा महिन्यांत ‘एनएसएस’च्या १२ हजार स्वयंसेवकांनी काम केले आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांच्या विकासाचा प्राथमिक आराखडे तयार केले आहेत. यामध्ये संबंधित गावांमधील शिक्षण, आरोग्य, पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, आदींच्या नियोजनाचा समावेश आहे. यासाठी ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले आहे. हे आराखडे मान्यतेसह पुढील कार्यवाहीसाठी शासनाला सादर केले आहेत. स्वयंपूर्ण गाव साकारणार ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत ‘एनएसएस’च्या माध्यमातून संबंधित गावे स्वयंपूर्ण, परिपूर्ण केली जाणार आहेत. शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावांचा विकास साधला जाणार असल्याचे विद्यापीठाचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची मूल्ये रुजविण्याचा विद्यापीठाचा उद्देशही सफल होईल. वर्षभरात महाविद्यालयांतील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा बनविला आहे. जिल्हानिहाय दत्तक गावे 62 कोल्हापूर 48 सांगली 45 सातारा