शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुणांचे ऐक्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST

सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजच्या तरुणांच्या मध्ये ऐक्य महत्त्वाचे आहे, असे ...

सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजच्या तरुणांच्या मध्ये ऐक्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले.

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी यांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा कांबळे होत्या.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून ‌‌‘गोकुळ’चे अध्यक्ष पाटील म्हणाले, समाज परिवर्तनासाठी ग्रामीण तरुणांनी पुढे आले पाहिजे. शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

यावेळी ग्रामपंचायतीतर्फे भेटवस्तूंचे वितरण विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी सरपंच एस. के. पाटील, युवा नेते माधव पाटील. उपसरपंच सचिन पाटील, संजय पाटील, तुळशी सहकार समूहाचे नेते सरदार पाटील, एकनाथ भोपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ग्रामसेवक बी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी मच्छिंद्र कांबळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ - शिरोली दुमाला (ता . करवीर) येथे ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते संगणक व भेटवस्तू वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सचिन पाटील, डॉ. मधुरा मोरे, सरदार पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, राहुल पाटील, एकनाथ भोपळे, एस. के. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.