शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

व्यापा­ऱ्यांची एकजुटीने सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

----- संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू ...

-----

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला व लगेचच दोन दिवसांनी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशात पूर्णतः लाॅकडाऊन जाहीर केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २६ मार्च रोजी कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे आढळला. तेथून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. या दरम्यान रोज महाराष्ट्र सरकार, भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होत होती. या तत्त्वानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन केले होते. या ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये नोटाबंदीचा कार्यकाळ आठवायला लागला. कारण नोटाबंदीच्या वेळीदेखील सरकारतर्फे रोज नवीन नियमांची भर पडायची. त्यामुळे या लाॅकडाऊनच्या कालावधीतदेखील जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांची रोज नवनवीन नियमांची भर पडत होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नसल्याने त्याचा नाहक मनस्ताप व्यापारी बंधू व जनता यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत होती.

कोरोना संसर्गजन्य रोग असल्याचे सरकारने बनविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणे आवश्यक होते; परंतु लाॅकडाऊन व लाॅकआऊट या मधील फरक न कळल्याने ग्राहकांची झुंबड वाढतच होती. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत होते. याकरिता अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना महसूल व पोलीस प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेऊन ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कणकवली तालुका व्यापारी संघटनेने केलेले कार्य काैतुकास्पद होते. या कार्यकाळात पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून सामान्य जनतेकरिता झटत होते. कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने या कोरोना योद्धयांना मास्क, हॅण्डग्लोव्हजचे वाटप केले गेले. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील व्यापारी, भाजीवाले, दूधवाले यांनाही मास्क वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मास्क मिळविण्यासाठी जाचक प्रयत्न करावे लागले. N65 हाच मास्क वापरणे अशा प्रकारचाही सरकारचा आदेश असल्यामुळे त्याची उपलब्धताही फार कमी होती. तरीही या मास्कचे वाटप करण्यात आले.

जुलै महिन्यात लॉकडाऊन थोड्या फार प्रमाणात शिथिल झाला, पण त्याचवेळी कणकवली शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण सापडले होते. याच दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या नवनवीन नियमांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अनेकवेळा संभ्रमावस्था झाली होती. बऱ्याच वेळा वादाचे प्रसंगही निर्माण झाले होते. अत्यावश्यक सेवा देणे हा सरकारचा आग्रह असल्याने इतर व्यापारी व किराणा व्यापारी यांच्यामध्ये दुराव्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यातच प्रवास करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने अपुरा कामगार वर्ग या सर्व समस्यांचा सामना करत अत्यावश्यक सेवा सरकारच्या नियमांत राहून देणे अनिर्वाय व बंधनकारक होते. याच दरम्यान काही सार्वजनिक संस्थांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासन व व्यापारी यांची मीटिंग वेळोवेळी होत असतानाही प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडले. या सर्व गोष्टी घडत असतानाही कणकवली शहरातील सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन गरजू लोकांची उपासमार होऊ नये या सामाजिक भावनेतून खाद्य उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्यापारी संघाचा विशेष सहभाग होता .

राजेश राजाध्यक्ष

(लेखक कणकवलीतील व्यापारी आहेत)

या लेखाला फोटो मिळालेले नाहीत. मिळाले तर मागाहून पाठवितो. अन्यथा फाईल फोटो घ्यावा.