शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा­ऱ्यांची एकजुटीने सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

----- संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू ...

-----

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला व लगेचच दोन दिवसांनी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशात पूर्णतः लाॅकडाऊन जाहीर केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २६ मार्च रोजी कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे आढळला. तेथून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. या दरम्यान रोज महाराष्ट्र सरकार, भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होत होती. या तत्त्वानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन केले होते. या ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये नोटाबंदीचा कार्यकाळ आठवायला लागला. कारण नोटाबंदीच्या वेळीदेखील सरकारतर्फे रोज नवीन नियमांची भर पडायची. त्यामुळे या लाॅकडाऊनच्या कालावधीतदेखील जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांची रोज नवनवीन नियमांची भर पडत होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नसल्याने त्याचा नाहक मनस्ताप व्यापारी बंधू व जनता यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत होती.

कोरोना संसर्गजन्य रोग असल्याचे सरकारने बनविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणे आवश्यक होते; परंतु लाॅकडाऊन व लाॅकआऊट या मधील फरक न कळल्याने ग्राहकांची झुंबड वाढतच होती. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत होते. याकरिता अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना महसूल व पोलीस प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेऊन ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कणकवली तालुका व्यापारी संघटनेने केलेले कार्य काैतुकास्पद होते. या कार्यकाळात पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून सामान्य जनतेकरिता झटत होते. कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने या कोरोना योद्धयांना मास्क, हॅण्डग्लोव्हजचे वाटप केले गेले. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील व्यापारी, भाजीवाले, दूधवाले यांनाही मास्क वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मास्क मिळविण्यासाठी जाचक प्रयत्न करावे लागले. N65 हाच मास्क वापरणे अशा प्रकारचाही सरकारचा आदेश असल्यामुळे त्याची उपलब्धताही फार कमी होती. तरीही या मास्कचे वाटप करण्यात आले.

जुलै महिन्यात लॉकडाऊन थोड्या फार प्रमाणात शिथिल झाला, पण त्याचवेळी कणकवली शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण सापडले होते. याच दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या नवनवीन नियमांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अनेकवेळा संभ्रमावस्था झाली होती. बऱ्याच वेळा वादाचे प्रसंगही निर्माण झाले होते. अत्यावश्यक सेवा देणे हा सरकारचा आग्रह असल्याने इतर व्यापारी व किराणा व्यापारी यांच्यामध्ये दुराव्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यातच प्रवास करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने अपुरा कामगार वर्ग या सर्व समस्यांचा सामना करत अत्यावश्यक सेवा सरकारच्या नियमांत राहून देणे अनिर्वाय व बंधनकारक होते. याच दरम्यान काही सार्वजनिक संस्थांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासन व व्यापारी यांची मीटिंग वेळोवेळी होत असतानाही प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडले. या सर्व गोष्टी घडत असतानाही कणकवली शहरातील सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन गरजू लोकांची उपासमार होऊ नये या सामाजिक भावनेतून खाद्य उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्यापारी संघाचा विशेष सहभाग होता .

राजेश राजाध्यक्ष

(लेखक कणकवलीतील व्यापारी आहेत)

या लेखाला फोटो मिळालेले नाहीत. मिळाले तर मागाहून पाठवितो. अन्यथा फाईल फोटो घ्यावा.