शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळेच्या विजयसिंह पाटीलचा खूनच !

By admin | Updated: December 4, 2015 00:23 IST

पनवेलच्या खाडीत आढळला मृतदेह : मारेकऱ्यांनी हातपाय तोडले, मानेवरही घाव; कारण अस्पष्ट

कऱ्हाड : उंडाळे येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या विजयसिंह पाटीलचा निर्घृण खून करण्यात आल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. विजयसिंहचा मृतदेह पनवेल येथे समुद्र किनाऱ्यावर एका खाडीत आढळला असून, मारेकऱ्यांनी त्याचे हातपाय तोडले आहेत. तसेच मानेवरही वार करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विजयसिंहचा कोणाशी वाद झाला होता का? याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुरुवारी काहीजणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही आणण्यात आले होते. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली असून, वेगवेगळ्या शक्यता गृहित धरून तपास केला जात आहे. उंडाळेतील विजयसिंह सुखदेव पाटील (वय २८) हा युवक गेल्या चार दिवसांपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता होता. ‘विटा येथून मजूर घेऊन यायचे आहेत,’ असे सांगून शनिवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. कऱ्हाडात आल्यानंतर भाऊ वैभव याच्याशी त्याचे मोबाईलवर बोलणे झाले. त्यावेळी गाडीत प्रवासी असल्याचे सांगत कऱ्हाडातून विट्याकडे निघाल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, त्यानंतर कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क झाला नाही. कुटुंबीयांनी विजयसिंहच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. रविवारी दिवसभर तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी याबाबत उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विजयसिंहचा शोध सुरू केला. अशातच सोमवारी कवठेमहांकाळ येथे नागज घाटामध्ये तेथील स्थानिक पोलिसांना चारचाकी गाडी बेवारस स्थितीत आढळून आली. गाडीमध्ये रक्ताचे डाग होते. तसेच तेथून काही अंतरावर रक्ताने माखलेला मोबाईल व वाहनाचा लोखंडी कमानपाटा आढळून आला. (पान १ वरून) विजयसिंहचे नातेवाईक त्याठिकाणी पोहोचल्यानंतर संबंधित गाडी, मोबाइल व बूट विजयसिंहचे असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मानवी शरीराचा काही मांसल भागही आढळून आला. त्यामुळे विजयसिंहचा घातपात झाल्याची शक्यता बळावली. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली. गुरुवारी काहीजणांना चौकशीसाठी तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांना काही माहिती मिळाली. कऱ्हाड पोलीस विजयसिंहचा शोध घेत असताना गुरुवारी दुपारी पनवेलला समुद्र किनारी खाडीत एका युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. खिशात आढळलेले ड्रायव्हिंग लायसन्स व डायरीवरून तो मृतदेह विजयसिंहचा असल्याचे निष्पन्न झाले. पनवेल पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे पथकासह पनवेलला रवाना झाले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह पनवेल येथीलच एका रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी कार्यवाही सुरू होती. थंड डोक्याचा नियोजनबद्ध कटज्यापद्धतीने विजयसिंहचा खून करण्यात आला त्यावरून थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध कट करूनच हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या गुन्'ात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असण्याची व विजयसिंहवर सलग काही दिवस पाळत ठेवण्यात आल्याची शक्यताही पोलीस व्यक्त करीत आहेत. विजयसिंह शनिवारी ‘विट्याला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर कऱ्हाडात पोहोचल्यावर त्याचे भावाशी मोबाईलवरही बोलणे झाले होते. मात्र, सोमवारी त्याची गाडी व इतर साहित्य नागज घाटात आढळले. तर मृतदेह गुरुवारी पनवेलच्या खाडीत सापडला. यावरून मारेकऱ्यांनी नागज घाटात विजयसिंहचा खून करून नंतर दुसऱ्या वाहनाने मृतदेह पनवेलला नेल्याची शक्यता आहे.मारेकरीच प्रवासी बनून आले का ?कऱ्हाडात आल्यानंतर भाऊ वैभव याच्याशी विजयसिंहचे बोलणे झाले. त्यावेळी गाडीत प्रवासी असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, घरातून बाहेर पडताना ‘विट्याहून मजूर आणायचे आहेत,’ असे विजयसिंह म्हणाला होता. त्यामुळे कऱ्हाडमध्ये गाडीत प्रवासी म्हणून बसलेलेच विजयसिंहचे मारेकरी आहेत का ? असाही प्रश्न पोलिसांसमोर आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. विजयसिंहचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. ज्याने कोणी त्याचा खून केला त्याने नियोजनबद्ध कट करूनच हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. खुनापाठीमागील कारण व हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच ते स्पष्ट होईल.- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक