शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोल्हापुरात रेशन दुकान तपासणीच्या नावाखाली वसुली, पावती न देता धान्यांवरही डल्ला

By भीमगोंड देसाई | Updated: February 11, 2025 19:09 IST

पुरवठा विभागातील खाबुगिरी : ‘अका’ करवी तक्रारी मॅनेज, ठोस कारवाई नसल्याने दलालीत वाढ

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाइन व्यवस्थेमुळे किती रेशनकार्डधारकांनी धान्य घेऊन गेले किती ? शिल्लक आहे किती ? याची सविस्तर माहिती जिल्हा पुरवठा, तालुका पुरवठा प्रशासनास एका क्लिकमध्ये मिळू शकते. पण तालुका कार्यालयातील कर्मचारी ऑपरेटर, खासगी उमेदवाराकरवी दुकान तपासणीचा फार्स करून हप्ता वसुलीच्या तक्रारी आहेत. हप्त्याचे पैसे गोळा करण्यासाठी अपवाद वगळता अनेक दुकानदार रेशनधारकांना पावती न देता धान्यांवर डल्ला मारतात. त्याचे शिल्लक धान्य खुल्या बाजारात विकले जात जात असल्याचेही आरोप होत आहेत.

पुरवठा व्यवस्थेतही खाबुगिरीसाठी शहर, तालुका पातळीवरही तयार झालेले ‘अका’ तक्रारी मॅनेज करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. यामुळेच तक्रारदारालाच हेलपाटे मारावे लागतात. परिणामी दोषी मोकाट राहत आहेत. शहर, करवीर पुरवठा व्यवस्थेत मनोहर, अशोक, निलम, जिल्ह्यात संतोष या दलालांची सध्या चलती आहे. याशिवाय ऑपरेटर, उमेदवारही वसुलीत आघाडीवर आहेत.दलाल म्हणून काम करीत असलेल्या ऑपरेटर यांचे मूळ काम पॉश मशीन दुरुस्त करणे, ऑनलाइन यंत्रणेत मदत करणे असे आहे. पण हेच अनेक पुरवठा कार्यालयात कारभारी बनले आहेत. ते कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कामकाजही करतात. यावरून त्यांचे अर्थपूर्ण वजन किती प्रभावशाली आहे, हे समोर येत आहे. 

म्हणूनच पुरवठा विभागात बदलीसाठी रस्सीखेचपुरवठा विभागात चांगली वरकमाई असल्याने तिथेच बदली होण्यासाठी महसूलमध्ये प्रत्येक वर्षी जोरदार रस्सीखेच असते. यासाठी त्या परिसरातील आमदार, खासदारांकडूनही मोर्चेबांधणी केली जाते. अशाप्रकारे क्रिम पोष्ट मिळाल्यानंतर पुरवठा कार्यालयात बसून वरकमाईचे उद्योग वाढत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी पुरवठा कार्यालयात बसून खासगी उमेदवार, ऑपरेटरच खुलेआम काम करीत असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर कारवाईचे धाडस होत नाही हे विशेष आहे.

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी..पुरवठा विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी रेशनमधील नाव कमी करणे, वाढवणे, विभाजन करणे, केवायसी करणे, पात्र असणाऱ्यांना नवीन रेशनकार्ड काढणे अशा कामांसाठी गावनिहाय शिबिर आयोजित करावेत, अशी मागणी आहे. पण ही मागणी बेदखल केली जात आहे.

कार्डधारकांना मेसेजदेण्याची सुविधा असावी..धान्य उपलब्धतेचा आणि धान्याचा कोटा घेऊन गेल्याचा मेसेज कार्डधारकांना देण्याची सुविधा असावी, जिल्हा पुरवठा तक्रार निवारण अधिकारी स्वतंत्र असावा, त्यांनी निपक्षपणे, पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर शिल्लक साठा, दर फलक, कार्डसंख्येचा फलक दर्शनी भागात लावण्याची सक्ती करावी, धान्य दिल्यानंतर कार्डधारकांना पावती मिळावी, अशी मागणी रेशन बचाव समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर