शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

गोकुळ शिरगाव दहशतीखाली,पान टपरीतील जळालेल्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:07 IST

उचगाव : शांत आणि औद्योगिक वसाहतीने चांगले बस्तान बसविलेल्या गोकुळ शिरगाव, तामगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी परिसराला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे.

ठळक मुद्देदोघांचे खून

मोहन सातपुते ।उचगाव : शांत आणि औद्योगिक वसाहतीने चांगले बस्तान बसविलेल्या गोकुळ शिरगाव, तामगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी परिसराला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. छोट्या व्यावसायिकांना हप्त्यासाठी धमकावले जात आहे. पोलिसांनी शोध घेऊन अशा हप्तेबहाद्दरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.या परिसरात प्लॉट खरेदी-विक्री व्यवहारातील एजंटगिरी, मटक्यातील भागीदारी, एखाद्याचा प्लॉट किंवा जमीन द्यायची असल्यास त्याला गाठायचे त्याच्याकडून उचललेले पैसे घ्यायचे, त्याचे पैसे दुसऱ्याला द्यायचे, असे प्रकार घडत आहे. आॅनलाईन लॉटरी, जमिनीचे व्यवहार, तीन पत्ती जुगार, लूटमार, भुरट्या चोºया, वाढती गुन्हेगारी येथील कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वाढत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. नोव्हेंबर १७ व फेब्रुवारी १८ मध्ये येथे दोन खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी फक्त दोन गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.गोकुळ शिरगाव येथील पान टपरीत जळालेल्या मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही. या परिसरात जमिनीला येणारे भाव, सावकारी, मटक्यात असलेली भागीदारी, छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत अडकलेल्या संशयित पण अट्टल पाकीटमार, दहशत निर्माण करून हप्तेगीरी करणाºया आणि आपल्या पैलवानकीच्या जोरावर दहशत निर्माण करून बगलबच्च्यांना सांभाळणाºया गावगुंडांची दहशत गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावून घेत आहे. मोकाटगुन्हेगार तर खंडणी, हप्ते, फुकटचे खाऊन दमदाटी देत फुकटच्या जेवणावर आजही ताव मारतआहेत.येथील वाढती गुन्हेगारी, वाटमारी, तर किरकोळ भांडणाचा राग मनात धरून वारंवार होणारे प्रसंग अनेकांना येत आहेत. कुळांना धमकावणे, रिकाम्या प्लॉटवर डोळा ठेऊन मोक्याच्या जागा हडप करणे, उद्योजक, व्यापारी, हॉटेलमालक, टपरीधारक, मॉल, गॅरेजधारकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. मोरेवाडी, पाचगाव, उजळाईवाडी, तामगाव, गोकुळ शिरगाव, शाहू नाका या परिसरात तर भुरट्या, सराईत गुंडांनी तर कहरच केला आहे. स्वत:च्या चैनीसाठी गुंडांनी गोरगरिबांवर अत्याचार करणे थांबविलेले नाहीत.मटक्यात असलेली भागीदारी, जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मिळालेले पैसे, गोरगरिबांना धमकावून मिळविलेली संपत्ती आणि हप्तेगिरी यामुळे गोकुळ शिरगाव परिसराला गुंडाच्या दहशतीचे ग्रहण लागले आहे. या गुंडांविषयी नेहमी तक्रारीचा आलेख वाढत असताना पोलिसांनाही त्याच्या मुसक्या आवळणे जिकरीचे बनले आहे.बदनाम ग्रुपचे नामफलक त्वरित काढले पाहिजेतआज बºयाच ठिकाणी युवकांचे ग्रुप तयार होत आहेत. पण, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे ग्रुप समाजकार्याच्या अडून दादागिरी करीत आहेत. अशा बदनाम ग्रुपचे नामफलक पोलिसांनी उखडून टाकले पाहिजेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखून