शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील पोर्ले तर्फ ठाणेत ‘बिनविरोध’चा डंका

By admin | Updated: April 19, 2016 01:02 IST

गटप्रमुखांनी राखला सलोखा : प्रमुख तीन संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय हेवेदावे, ईर्ष्येला फाटा

सरदार चौगुले --- पोर्ले तर्फ ठाणे --निवडणूक म्हटलं की, गटनेत्यांची दमछाक, इच्छुकांची आक्रमकता आणि मतदारांची गोची, या समीकरणात निवडणूक प्रक्रिया पार पडते. परंतु, निवडणुकीतील राजकीय हेवेदावे व ईर्ष्येला फाटा देत पन्हाळा तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या पोर्ले तर्फ ठाण्यातील मोठा आर्थिक व्यवहार असणाऱ्या तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करून येथील गटप्रमुखांनी राजकीय सलोखा साधला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय सारिपाटावरील ही एक राजकीय खेळीच आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या गावाने तालुक्यातील राजकारणात आपला दबदबा कायम राखला आहे. तालुक्याच्या राजकारणातील निर्णयात या गावाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील राजकीय हालचालींवर मोठ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. सर्वच पक्षांची सरमिसळ असणाऱ्या पोर्ले गावात अकरा सहकारी संस्थांचं जाळं आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (पोर्लेकर) यांचा कासारी गट, बाजार समितीचे सभापती परशराम खुडे यांचा उदय गट, औषधाला न पुरणारी शिवसेना विधानसभेत गुलाल लावून राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारा सर्जेराव सासने राजकीय खेळी करून राजकारणात आपली मोहर उमटवित आहे. एकंदरीत राजकीय ईर्ष्या, अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी गावात राजकीय वार असताना सक्षम असणाऱ्या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने गावातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत पडझड झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कासारी दूध संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. केवळ राजकीय ईर्ष्येपोटी निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या गटातील ‘हनुमान विकास’ची निवडणूक बिनविरोध करून दिली. याच गमक अनेकांना समजलं नाही. तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उदय दूध व उदय पतसंस्थेच्या निवडणुका होणार असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, गटनेते परशराम खुडे यांच्या संयमी राजकीय खेळीने इच्छुक कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे निवडणुकीसारखी नामुष्की या गटावरील टळली. गावातील उदय गट व कासारी गट जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या नेत्यांनी ‘वारणेचा वाघाचा’ शब्द पाळून पक्षांतर्गत राजकीय सलोखा राखला आहे. इतर गट शांत राहून आगामी निवडणुकीत आपले फासे अडकविण्यात मश्गुल आहेत. सलोख्याच्या राजकारणात संस्थेच्या निवडणुका होवो न होवो; पण या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ‘त्या’ संस्थांच्या सभासदांनी निवडणुकीच्या गोचीतून नि:श्वास टाकला आहे, हे मात्र खरे.