शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

संवेदनशील पोर्ले तर्फ ठाणेत ‘बिनविरोध’चा डंका

By admin | Updated: April 19, 2016 01:02 IST

गटप्रमुखांनी राखला सलोखा : प्रमुख तीन संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय हेवेदावे, ईर्ष्येला फाटा

सरदार चौगुले --- पोर्ले तर्फ ठाणे --निवडणूक म्हटलं की, गटनेत्यांची दमछाक, इच्छुकांची आक्रमकता आणि मतदारांची गोची, या समीकरणात निवडणूक प्रक्रिया पार पडते. परंतु, निवडणुकीतील राजकीय हेवेदावे व ईर्ष्येला फाटा देत पन्हाळा तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या पोर्ले तर्फ ठाण्यातील मोठा आर्थिक व्यवहार असणाऱ्या तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करून येथील गटप्रमुखांनी राजकीय सलोखा साधला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय सारिपाटावरील ही एक राजकीय खेळीच आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या गावाने तालुक्यातील राजकारणात आपला दबदबा कायम राखला आहे. तालुक्याच्या राजकारणातील निर्णयात या गावाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील राजकीय हालचालींवर मोठ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. सर्वच पक्षांची सरमिसळ असणाऱ्या पोर्ले गावात अकरा सहकारी संस्थांचं जाळं आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (पोर्लेकर) यांचा कासारी गट, बाजार समितीचे सभापती परशराम खुडे यांचा उदय गट, औषधाला न पुरणारी शिवसेना विधानसभेत गुलाल लावून राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारा सर्जेराव सासने राजकीय खेळी करून राजकारणात आपली मोहर उमटवित आहे. एकंदरीत राजकीय ईर्ष्या, अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी गावात राजकीय वार असताना सक्षम असणाऱ्या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने गावातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत पडझड झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कासारी दूध संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. केवळ राजकीय ईर्ष्येपोटी निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या गटातील ‘हनुमान विकास’ची निवडणूक बिनविरोध करून दिली. याच गमक अनेकांना समजलं नाही. तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उदय दूध व उदय पतसंस्थेच्या निवडणुका होणार असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, गटनेते परशराम खुडे यांच्या संयमी राजकीय खेळीने इच्छुक कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे निवडणुकीसारखी नामुष्की या गटावरील टळली. गावातील उदय गट व कासारी गट जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या नेत्यांनी ‘वारणेचा वाघाचा’ शब्द पाळून पक्षांतर्गत राजकीय सलोखा राखला आहे. इतर गट शांत राहून आगामी निवडणुकीत आपले फासे अडकविण्यात मश्गुल आहेत. सलोख्याच्या राजकारणात संस्थेच्या निवडणुका होवो न होवो; पण या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ‘त्या’ संस्थांच्या सभासदांनी निवडणुकीच्या गोचीतून नि:श्वास टाकला आहे, हे मात्र खरे.