शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

संवेदनशील पोर्ले तर्फ ठाणेत ‘बिनविरोध’चा डंका

By admin | Updated: April 19, 2016 01:02 IST

गटप्रमुखांनी राखला सलोखा : प्रमुख तीन संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय हेवेदावे, ईर्ष्येला फाटा

सरदार चौगुले --- पोर्ले तर्फ ठाणे --निवडणूक म्हटलं की, गटनेत्यांची दमछाक, इच्छुकांची आक्रमकता आणि मतदारांची गोची, या समीकरणात निवडणूक प्रक्रिया पार पडते. परंतु, निवडणुकीतील राजकीय हेवेदावे व ईर्ष्येला फाटा देत पन्हाळा तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या पोर्ले तर्फ ठाण्यातील मोठा आर्थिक व्यवहार असणाऱ्या तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करून येथील गटप्रमुखांनी राजकीय सलोखा साधला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय सारिपाटावरील ही एक राजकीय खेळीच आहे.गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या गावाने तालुक्यातील राजकारणात आपला दबदबा कायम राखला आहे. तालुक्याच्या राजकारणातील निर्णयात या गावाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील राजकीय हालचालींवर मोठ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. सर्वच पक्षांची सरमिसळ असणाऱ्या पोर्ले गावात अकरा सहकारी संस्थांचं जाळं आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (पोर्लेकर) यांचा कासारी गट, बाजार समितीचे सभापती परशराम खुडे यांचा उदय गट, औषधाला न पुरणारी शिवसेना विधानसभेत गुलाल लावून राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारा सर्जेराव सासने राजकीय खेळी करून राजकारणात आपली मोहर उमटवित आहे. एकंदरीत राजकीय ईर्ष्या, अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी गावात राजकीय वार असताना सक्षम असणाऱ्या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने गावातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत पडझड झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कासारी दूध संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. केवळ राजकीय ईर्ष्येपोटी निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या गटातील ‘हनुमान विकास’ची निवडणूक बिनविरोध करून दिली. याच गमक अनेकांना समजलं नाही. तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उदय दूध व उदय पतसंस्थेच्या निवडणुका होणार असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, गटनेते परशराम खुडे यांच्या संयमी राजकीय खेळीने इच्छुक कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे निवडणुकीसारखी नामुष्की या गटावरील टळली. गावातील उदय गट व कासारी गट जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या नेत्यांनी ‘वारणेचा वाघाचा’ शब्द पाळून पक्षांतर्गत राजकीय सलोखा राखला आहे. इतर गट शांत राहून आगामी निवडणुकीत आपले फासे अडकविण्यात मश्गुल आहेत. सलोख्याच्या राजकारणात संस्थेच्या निवडणुका होवो न होवो; पण या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ‘त्या’ संस्थांच्या सभासदांनी निवडणुकीच्या गोचीतून नि:श्वास टाकला आहे, हे मात्र खरे.