शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:02 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शाळांच्या सुट्यांमध्ये यंदा कमालीचा विस्कळीतपणा पाहावयास मिळत आहे. खासगी व माध्यमिक शाळांची १ मे, प्राथमिक शाळांची ५ मे, तर महापालिकांच्या शाळांची १२ मेपासून सुटी सुरू होत आहे. पेपर संपल्यापासून म्हणजेच १५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे; त्यामुळे जवळपास महिनाभर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शाळांच्या सुट्यांमध्ये यंदा कमालीचा विस्कळीतपणा पाहावयास मिळत आहे. खासगी व माध्यमिक शाळांची १ मे, प्राथमिक शाळांची ५ मे, तर महापालिकांच्या शाळांची १२ मेपासून सुटी सुरू होत आहे. पेपर संपल्यापासून म्हणजेच १५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे; त्यामुळे जवळपास महिनाभर विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांना शाळेत हजर राहण्याची एकप्रकारची शिक्षाच दिल्याने शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता आहे.सर्वांत जास्त सुट्या या शाळांना असतात. विद्यार्थी हा उत्सवप्रिय असल्याने सण, जयंत्या, उत्सवानिमित्त सुट्या दिल्या जातात. दीपावलीसाठी पंधरा ते एकवीस दिवसांपर्यंत सुटी असते. त्यानंतर उन्हाळ्याची सुटी मोठी असते. महाराष्टÑात फेब्रुवारी-मार्चपासून कडक उन्हाळ्यास सुरुवात होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सकाळची शाळा सुरू होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळा अधिक तीव्र होत असल्याने तत्पूर्वीच परीक्षा घेतली जाते. आपल्याकडे महाविद्यालयीन वगळता १५ एप्रिलच्या आत विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होतात. परीक्षा संपली की मुले शाळेकडे पाठ फिरवितात. त्यात शिक्षकांना निकालासह इतर कामे करायची असल्याने तेही विद्यार्थ्यांना सक्ती करीत नाहीत.पंधरा दिवसांत निकाल तयार होऊन १ मे रोजी निकालपत्रे देऊन सुटी सुरू आणि १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायचे.अलीकडे शिक्षण विभागाने या वेळापत्रकात बदल केला आहे. यंदा खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे निकाल १ मे रोजी लागले; पण जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांचे निकाल ५ मे रोजी जाहीर झाले; तर त्यापेक्षा कहर म्हणजे महापालिकांतर्गत येणाºया शाळांचे निकाल १२ मे रोजी जाहीर करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. किमान या शाळा एकाच वेळी सुरू करण्याची अपेक्षा होती; पण खासगी शाळा ५ जून रोजी, तर माध्यमिक, प्राथमिक शाळा १५ जून रोजी सुरू होत आहेत. महापालिकेच्या शाळा तर २१ जूनला सुरू होणार आहेत. विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पाहावयास मिळत असून १ मे रोजी निकाल आणि १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात व्हावी, अशी मागणी होत आहे.वर्षभरात ७६ सुट्याशाळांना रविवारच्या सुट्या सोडून उन्हाळी, दीपावलीसह इतर ७६ सुट्या असतात. त्यांचे नियोजन शिक्षण विभागाने करावयाचे असते. पेपर संपल्यापासून म्हणजे १५ एप्रिलपासून २१ जूनपर्यंत सव्वादोन महिने मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला फेकली जातात. प्रदीर्घ सुटीनंतर त्यांना पूर्ववत होण्यास महिन्याभराचा कालावधी लागत असल्याने यामध्ये विद्यार्थ्यांचेही नुकसान आहे.