शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरामध्ये ऐरणीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार असून, दंड भरून सदरची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील १२६५० विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार आहेत. यामुळे घरफाळ्याची शास्ती कायमस्वरुपी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात शहरी व ग्रामीण परिसरात विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यापैकी शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरामध्ये ऐरणीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार असून, दंड भरून सदरची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील १२६५० विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार आहेत. यामुळे घरफाळ्याची शास्ती कायमस्वरुपी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात शहरी व ग्रामीण परिसरात विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यापैकी शहरातील अनधिकृत बांधकामांमुळे त्यांना मुलभूत नागरी सेवा-सुविधा देण्याचा ताण स्थानिक स्वराज्य संस्थांवर-नगरपालिका, महापालिकांवर पडत असे. परिणामी सुमारे बारा वर्षांपूर्वी शासनाने अनधिकृत बांधकामासाठी शास्ती लावण्याचा निर्णय घेतला. विनापरवाना बांधकामांसाठी त्या बांधकामाला लागू असेल, तो घरफाळा व दुप्पट शास्ती असा तिप्पट घरफाळा आकारला जात असे.अनधिकृत बांधकामांबाबत शासनाच्या शास्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी इचलकरंजी नगरपालिकेने दहा वर्षांपूर्वीपासून सुरू केली. दुप्पट दंडाच्या आणि तिप्पट घरफाळ्याच्या नोटिसा संबंधित मालमत्ताधारकांना लागू केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शहरातील हजारो बांधकामांना अशा प्रकारच्या नोटिसा गेल्यामुळे हा विषय नगरपालिकेच्या तत्कालीन सभागृहामध्येसुद्धा गाजला होता. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती रद्द करावी, म्हणून गेल्या दहा वर्षात नगरपालिकेच्या सभांमध्ये तीनवेळा ठराव घेण्यात आले. मात्र, शासनाने तसा कायदाच केल्यामुळे सदरचे तिन्हीही ठराव फेटाळले गेले.दरम्यान, शासनाने अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी नियमावलीची अधिसूचना २१ जुलै २०१७ रोजी जाहीर केली होती. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अशा हरकती व सूचनांची दखल घेवून शासनाच्या नगरविकास विभागाने अंतिम मसुदा तयार केला आहे. या मसुद्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकवेळ दंड भरून घेवून नियमित केली जाणार आहेत.