शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरामध्ये ऐरणीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार असून, दंड भरून सदरची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील १२६५० विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार आहेत. यामुळे घरफाळ्याची शास्ती कायमस्वरुपी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात शहरी व ग्रामीण परिसरात विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यापैकी शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरामध्ये ऐरणीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार असून, दंड भरून सदरची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील १२६५० विनापरवाना बांधकामे अधिकृत होणार आहेत. यामुळे घरफाळ्याची शास्ती कायमस्वरुपी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात शहरी व ग्रामीण परिसरात विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यापैकी शहरातील अनधिकृत बांधकामांमुळे त्यांना मुलभूत नागरी सेवा-सुविधा देण्याचा ताण स्थानिक स्वराज्य संस्थांवर-नगरपालिका, महापालिकांवर पडत असे. परिणामी सुमारे बारा वर्षांपूर्वी शासनाने अनधिकृत बांधकामासाठी शास्ती लावण्याचा निर्णय घेतला. विनापरवाना बांधकामांसाठी त्या बांधकामाला लागू असेल, तो घरफाळा व दुप्पट शास्ती असा तिप्पट घरफाळा आकारला जात असे.अनधिकृत बांधकामांबाबत शासनाच्या शास्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी इचलकरंजी नगरपालिकेने दहा वर्षांपूर्वीपासून सुरू केली. दुप्पट दंडाच्या आणि तिप्पट घरफाळ्याच्या नोटिसा संबंधित मालमत्ताधारकांना लागू केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शहरातील हजारो बांधकामांना अशा प्रकारच्या नोटिसा गेल्यामुळे हा विषय नगरपालिकेच्या तत्कालीन सभागृहामध्येसुद्धा गाजला होता. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती रद्द करावी, म्हणून गेल्या दहा वर्षात नगरपालिकेच्या सभांमध्ये तीनवेळा ठराव घेण्यात आले. मात्र, शासनाने तसा कायदाच केल्यामुळे सदरचे तिन्हीही ठराव फेटाळले गेले.दरम्यान, शासनाने अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी नियमावलीची अधिसूचना २१ जुलै २०१७ रोजी जाहीर केली होती. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अशा हरकती व सूचनांची दखल घेवून शासनाच्या नगरविकास विभागाने अंतिम मसुदा तयार केला आहे. या मसुद्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकवेळ दंड भरून घेवून नियमित केली जाणार आहेत.