शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

उपनगरांत अनधिकृत बांधकामे जोरात--शासकीय नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:12 IST

दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे दुर्लक्ष, पदपथास चिकटून अनेक ठिकाणी कामे

अमर पाटील ।कळंबा : दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे. उपनगरांत वाहतुकीची कोंडी टाळावी, रस्ते अपघातमुक्त राहावेत, यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. पादचाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी मुख्य रस्त्यालगत पदपथ विकसित करण्यात आले. शासकीय नियमान्वये या पदपथापासून साडेचार मीटर खासगी जागेत बांधकाम करता येत नाही; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून पदपथास लागून बांधकामे सुरू आहेत.

अनधिकृत बांधकामांची व्याप्ती इतकी वाढली आहे की, आरक्षित भूखंड, राखीव भूखंड इतकेच काय नैसर्गिक नालेही अतिक्रमणमुक्त राहिले नाहीत.वाढती लोकसंख्या व प्रशासकीय अधिकाºयांची कमतरता हे कारण प्रशासन नेहमीच पुढे करते. वास्तविक पालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाने अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५५ अन्वये खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रशासनास निदर्शनास आल्यास एक महिन्याच्या मुदतीची नोटीस देणे क्रमप्राप्त आहे. या मुदतीत अनधिकृत बांधकाम न काढल्यास ते पाडण्याची तरतूद आहे; पण कार्यवाही करायची कोणी, हेच अनुत्तरित आहे.

राखीव भूखंडांबाबत पालिकेने लक्ष न देता जाणीवपूर्वक कानाडोळा केला, तर अधिकाºयांनी याप्रश्नी नियमातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. परिणामी, हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेले आहेत. आता यावर अनधिकृत बांधकामे झाल्याचे आरोप आता नवीन राहिले नाहीत. उपनगरांत पालिका हद्दीत खासगी जमीनमालक पालिका प्रशासनास न जुमानता बांधकाम नियमावली धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकामे करीत आहेत. त्यावर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे.

खासगी जमीनमालकांनी रस्त्यालगत अनधिकृत शेड, खोल्या बांधून त्या व्यवसायासाठी भाड्याने दिल्या आहेत. पदपथालगत अनधिकृत घरे बांधण्याची लागलेली स्पर्धा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही? यावर प्रशासन कारवाईचा बडगा उगारत नसल्याने भविष्यात हा प्रश्न जटील बनण्याची शक्यताआहे.भराव टाकून नाल्याची पात्रे वळविलीउपनगरात प्रत्येक प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले वाहतात. या नाल्यांच्या पात्रापासून ठराविक अंतरावर बांधकाम करता येत नाही, असे असूनही बºयाच ठिकाणी नाल्यांच्या पात्रात भराव टाकून नाल्यांची पात्रे वळवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याचा परिणाम प्रत्येक पावसाळ्यात दिसून येतो. प्रत्येक पावसाळ्यात किमान शंभरावर कॉलनीतील नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर