शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

उपनगरांत अनधिकृत बांधकामे जोरात--शासकीय नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:12 IST

दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे दुर्लक्ष, पदपथास चिकटून अनेक ठिकाणी कामे

अमर पाटील ।कळंबा : दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे. उपनगरांत वाहतुकीची कोंडी टाळावी, रस्ते अपघातमुक्त राहावेत, यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. पादचाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी मुख्य रस्त्यालगत पदपथ विकसित करण्यात आले. शासकीय नियमान्वये या पदपथापासून साडेचार मीटर खासगी जागेत बांधकाम करता येत नाही; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून पदपथास लागून बांधकामे सुरू आहेत.

अनधिकृत बांधकामांची व्याप्ती इतकी वाढली आहे की, आरक्षित भूखंड, राखीव भूखंड इतकेच काय नैसर्गिक नालेही अतिक्रमणमुक्त राहिले नाहीत.वाढती लोकसंख्या व प्रशासकीय अधिकाºयांची कमतरता हे कारण प्रशासन नेहमीच पुढे करते. वास्तविक पालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाने अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५५ अन्वये खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रशासनास निदर्शनास आल्यास एक महिन्याच्या मुदतीची नोटीस देणे क्रमप्राप्त आहे. या मुदतीत अनधिकृत बांधकाम न काढल्यास ते पाडण्याची तरतूद आहे; पण कार्यवाही करायची कोणी, हेच अनुत्तरित आहे.

राखीव भूखंडांबाबत पालिकेने लक्ष न देता जाणीवपूर्वक कानाडोळा केला, तर अधिकाºयांनी याप्रश्नी नियमातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. परिणामी, हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेले आहेत. आता यावर अनधिकृत बांधकामे झाल्याचे आरोप आता नवीन राहिले नाहीत. उपनगरांत पालिका हद्दीत खासगी जमीनमालक पालिका प्रशासनास न जुमानता बांधकाम नियमावली धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकामे करीत आहेत. त्यावर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे.

खासगी जमीनमालकांनी रस्त्यालगत अनधिकृत शेड, खोल्या बांधून त्या व्यवसायासाठी भाड्याने दिल्या आहेत. पदपथालगत अनधिकृत घरे बांधण्याची लागलेली स्पर्धा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही? यावर प्रशासन कारवाईचा बडगा उगारत नसल्याने भविष्यात हा प्रश्न जटील बनण्याची शक्यताआहे.भराव टाकून नाल्याची पात्रे वळविलीउपनगरात प्रत्येक प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले वाहतात. या नाल्यांच्या पात्रापासून ठराविक अंतरावर बांधकाम करता येत नाही, असे असूनही बºयाच ठिकाणी नाल्यांच्या पात्रात भराव टाकून नाल्यांची पात्रे वळवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याचा परिणाम प्रत्येक पावसाळ्यात दिसून येतो. प्रत्येक पावसाळ्यात किमान शंभरावर कॉलनीतील नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर