शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

उदगावकरांच्या पाचवीला कचराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ओळखून तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जयसिंगपूर शहरालगत व सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे २२ हजारांवर लोकसंख्या असलेल्या उदगावचा वाढत्या उपनगरांमुळे मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीची स्वच्छता तीन ते चार महिन्यांतून किंवा नागरिकांचा मोर्चा आल्यावर केली जाते. तर गेल्या वर्षभरापासून गावातील अनेक चौकांत कचºयाचे ढीग तब्बल दोन ते तीन महिने पडून राहत आहेत. त्यामुळे गावातील अनेक प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.नागरिकांतून वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना कचºयाबाबत सांगितले जाते. मात्र, कमी कर्मचाºयांचे कारण सांगून कचºयाकडे दुर्लक्ष केल्यानेच कचरा प्रश्न वारंवार समोर येत आहे. तर शुक्रवारी दलित समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकाºयांना महिलांनी घेराव घातल्यानंतर दलित वस्तीतील कचरा काढण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी जर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर स्वच्छता केली जात असेल, तर ग्रामपंचायत काय काम करीत आहे? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.चिंचवाड, जयसिंगपूर, उमळवाड, रेल्वे स्टेशन, सांगली, नदीवेस, काळम्मावाडी, फकीर रस्ता, गावठाण तलाव यांसह परिसरातील रस्त्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.