शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

उदगावकरांच्या पाचवीला कचराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ओळखून तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जयसिंगपूर शहरालगत व सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे २२ हजारांवर लोकसंख्या असलेल्या उदगावचा वाढत्या उपनगरांमुळे मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीची स्वच्छता तीन ते चार महिन्यांतून किंवा नागरिकांचा मोर्चा आल्यावर केली जाते. तर गेल्या वर्षभरापासून गावातील अनेक चौकांत कचºयाचे ढीग तब्बल दोन ते तीन महिने पडून राहत आहेत. त्यामुळे गावातील अनेक प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.नागरिकांतून वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना कचºयाबाबत सांगितले जाते. मात्र, कमी कर्मचाºयांचे कारण सांगून कचºयाकडे दुर्लक्ष केल्यानेच कचरा प्रश्न वारंवार समोर येत आहे. तर शुक्रवारी दलित समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकाºयांना महिलांनी घेराव घातल्यानंतर दलित वस्तीतील कचरा काढण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी जर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर स्वच्छता केली जात असेल, तर ग्रामपंचायत काय काम करीत आहे? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.चिंचवाड, जयसिंगपूर, उमळवाड, रेल्वे स्टेशन, सांगली, नदीवेस, काळम्मावाडी, फकीर रस्ता, गावठाण तलाव यांसह परिसरातील रस्त्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.