शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

उदगावकरांच्या पाचवीला कचराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ओळखून तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जयसिंगपूर शहरालगत व सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे २२ हजारांवर लोकसंख्या असलेल्या उदगावचा वाढत्या उपनगरांमुळे मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीची स्वच्छता तीन ते चार महिन्यांतून किंवा नागरिकांचा मोर्चा आल्यावर केली जाते. तर गेल्या वर्षभरापासून गावातील अनेक चौकांत कचºयाचे ढीग तब्बल दोन ते तीन महिने पडून राहत आहेत. त्यामुळे गावातील अनेक प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.नागरिकांतून वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना कचºयाबाबत सांगितले जाते. मात्र, कमी कर्मचाºयांचे कारण सांगून कचºयाकडे दुर्लक्ष केल्यानेच कचरा प्रश्न वारंवार समोर येत आहे. तर शुक्रवारी दलित समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकाºयांना महिलांनी घेराव घातल्यानंतर दलित वस्तीतील कचरा काढण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी जर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर स्वच्छता केली जात असेल, तर ग्रामपंचायत काय काम करीत आहे? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.चिंचवाड, जयसिंगपूर, उमळवाड, रेल्वे स्टेशन, सांगली, नदीवेस, काळम्मावाडी, फकीर रस्ता, गावठाण तलाव यांसह परिसरातील रस्त्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.