शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

केंद्राची महिलांसाठीची उद्योगिनी योजना ठरली फार्सच, कोल्हापूर जिल्ह्यात नाही एकही लाभार्थी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 19, 2024 16:06 IST

बँकाही अनभिज्ञ

इंदुमती गणेशकोल्हापूर : महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली उद्योगिनी ही कर्ज याेजना जिल्ह्यासाठी फार्सच ठरली आहे. ही योजना राबविण्याबाबतचे कोणतेच निर्देश शासन स्तरावर आलेले नसल्याने जिल्ह्यात एकही महिला या योजनेची लाभार्थी नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकांनादेखील या योजनेची माहिती नाही.केंद्र शासनाने उद्योगिनी' योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत वेगवेगळे ८८ प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा हा एक भाग असून, या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते, तसेच महिलांना उद्योजक-व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करते.सर्वांत प्रथम ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केली. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते.ही योजना २०२० साली सुरू झाली असली तरी जिल्ह्यात अद्याप एकही महिला लाभार्थी नाही. किंबहुना याबाबत अग्रणी बँकेलाही माहिती नाही, किंबहुना केंद्र शासनाकडून त्याबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात ही योजना अजून सुरूच झालेली नाही. मात्र, अग्रणी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे.

काय आहेत निकषलाभार्थी होण्यासाठी अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे. दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्तांसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. त्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाते. इतर प्रवर्गातील महिलांना १० ते १२ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. ज्या बँकेचे कर्ज घेतले जाते. त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर असतो. याशिवाय कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार ३० टक्के अनुदान दिले जाते.

बँकांही अनभिज्ञया योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांनी ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन योजनेचे नाव टाकून अर्ज करावेत, असे सांगितले आहे किंवा उद्योगिनी या वेबसाइटवर जाऊन, तसेच ऑफलाइन अर्जदेखील करता येतो, असे म्हटले आहे; पण याबाबत दोन-तीन राष्ट्रीयीकृत बँकांना विचारणा केली असता त्यांनी अशी कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारWomenमहिलाbankबँक