शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

भावांनो..! फुटबॉल हवा की हाणामारी?, कोल्हापुरात खेळातील ईर्षा चुकीच्या दिशेने; विचार करण्याची गरज

By भारत चव्हाण | Updated: January 30, 2023 15:54 IST

मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार

भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूरचाफुटबॉल खेळ बहरला पाहिजे, देशपातळीवर कोल्हापूरचे नाव झाले पाहिजे, येथील खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, खेळाडूंचे याच खेळात करिअर घडले पाहिजे, अशी सगळ्यांचीच भावना आहे; पण वारंवार मैदानावर प्रेक्षकांत होणारी हुल्लडबाजी, खेळाडू, समर्थकांत होणारी हाणामारी, मैदानावरील चप्पल, बाटल्याची फेकाफेकीचे प्रकार पाहता तमाम शौकिनांच्या भावनांना छेद देण्याचे प्रकार घडत आहेत, म्हणून फुटबॉल खेळच बंद करूया का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.एकदा दोनदा नव्हे अनेक वेळा फुटबॉलच्या मैदानावर होणारी हुल्लडबाजी, पेठा पेठातील अनावश्यक ईर्षा, फालतून अभिमान, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चांगल्या खेळाच्रूा कौतुकाऐवजी त्याचा द्वेश करण्यावृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.पोलिस प्रशासनाने दखल घेऊन समजावण्याचा, एकोपा ठेवण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांनी प्रतिस्पर्धी संघ व समर्थकांत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या विकासासाठी, खेळाडूंच्या करिअरसाठी एवढे सगळे प्रयत्न होऊनही जर ‘पालथ्या घागरीवर पाणी’ पडणार असेल तर मग फुटबॉल स्पर्धा तरी का आणि कशासाठी भरवायच्या, असा उद्विग्न सवाल शौकिनातून विचारला जात आहे.मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार झाला आहे. मान्यवरांच्या प्रयत्नामुळे वादावर पडदा टाकायचा, त्यानंतर शंभर दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात सामने घ्यायचे. थोडेच दिवस सामने सुरळीत झाले की मग पुन्हा वाद, ईर्षा, दगडफेक, हुल्लडबाजी असा अनुभव येत आहे. खेळाडू आचारसंहिता पाळणार नाहीत, समर्थक निरर्थक अभिमान सोडून देणार नसतील तर मग सामने भरविणे बंद करावेत किंवा याबाबतीत संबंधितांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत, उलट पेठापेठात द्वेष वाढतच राहणार आहे.

काय करायला पाहिजे?

  • सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करून कोणी ऐकत नसेल तर कडक धोरण स्वीकारणे अपरिहार्य.
  • खेळाडू आचारसंहिता पाळणार नसतील तर त्यांच्यावर ठोस कारवाई करायला पाहिजे.
  • खेळाडूंनी हाणामारीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले तर त्या खेळाडूवर बंदी घातली पाहिजे.
  • संघ, खेळाडूंवर कारवाई करताना संबंधित पंच, केएसए यांनी दुजाभाव करता कामा नये.
  • मैदानाच्या बाहेर उमटणाऱ्या घटनांची नोंद घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी.
  • केएसए, पंच यांची भूमिका नि:संशय ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल