शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भावांनो..! फुटबॉल हवा की हाणामारी?, कोल्हापुरात खेळातील ईर्षा चुकीच्या दिशेने; विचार करण्याची गरज

By भारत चव्हाण | Updated: January 30, 2023 15:54 IST

मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार

भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूरचाफुटबॉल खेळ बहरला पाहिजे, देशपातळीवर कोल्हापूरचे नाव झाले पाहिजे, येथील खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, खेळाडूंचे याच खेळात करिअर घडले पाहिजे, अशी सगळ्यांचीच भावना आहे; पण वारंवार मैदानावर प्रेक्षकांत होणारी हुल्लडबाजी, खेळाडू, समर्थकांत होणारी हाणामारी, मैदानावरील चप्पल, बाटल्याची फेकाफेकीचे प्रकार पाहता तमाम शौकिनांच्या भावनांना छेद देण्याचे प्रकार घडत आहेत, म्हणून फुटबॉल खेळच बंद करूया का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.एकदा दोनदा नव्हे अनेक वेळा फुटबॉलच्या मैदानावर होणारी हुल्लडबाजी, पेठा पेठातील अनावश्यक ईर्षा, फालतून अभिमान, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चांगल्या खेळाच्रूा कौतुकाऐवजी त्याचा द्वेश करण्यावृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.पोलिस प्रशासनाने दखल घेऊन समजावण्याचा, एकोपा ठेवण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांनी प्रतिस्पर्धी संघ व समर्थकांत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या विकासासाठी, खेळाडूंच्या करिअरसाठी एवढे सगळे प्रयत्न होऊनही जर ‘पालथ्या घागरीवर पाणी’ पडणार असेल तर मग फुटबॉल स्पर्धा तरी का आणि कशासाठी भरवायच्या, असा उद्विग्न सवाल शौकिनातून विचारला जात आहे.मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार झाला आहे. मान्यवरांच्या प्रयत्नामुळे वादावर पडदा टाकायचा, त्यानंतर शंभर दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात सामने घ्यायचे. थोडेच दिवस सामने सुरळीत झाले की मग पुन्हा वाद, ईर्षा, दगडफेक, हुल्लडबाजी असा अनुभव येत आहे. खेळाडू आचारसंहिता पाळणार नाहीत, समर्थक निरर्थक अभिमान सोडून देणार नसतील तर मग सामने भरविणे बंद करावेत किंवा याबाबतीत संबंधितांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत, उलट पेठापेठात द्वेष वाढतच राहणार आहे.

काय करायला पाहिजे?

  • सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करून कोणी ऐकत नसेल तर कडक धोरण स्वीकारणे अपरिहार्य.
  • खेळाडू आचारसंहिता पाळणार नसतील तर त्यांच्यावर ठोस कारवाई करायला पाहिजे.
  • खेळाडूंनी हाणामारीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले तर त्या खेळाडूवर बंदी घातली पाहिजे.
  • संघ, खेळाडूंवर कारवाई करताना संबंधित पंच, केएसए यांनी दुजाभाव करता कामा नये.
  • मैदानाच्या बाहेर उमटणाऱ्या घटनांची नोंद घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी.
  • केएसए, पंच यांची भूमिका नि:संशय ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल