शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

By admin | Updated: August 10, 2016 01:11 IST

चंद्रदीप नरके यांचे आंदोलन : प्रशासनाची कानउघाडणी; पुलाची आज पुन्हा पाहणी

कोल्हापूर : पुराचे पाणी काही प्रमाणात उतरल्यानंतर मंगळवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवाजी पुलावर आंदोलन केल्यानंतर हा पूल किमान दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ही परवानगी दिली. पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे हा पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गे महामार्गाकडे वळविली होती; पण हा पूल बंद केल्यामुळे शहरालगतच्या अनेक गावांतील ग्रामस्थांची मोठी कुचंबणा झाली होती.मंगळवारी शिवाजी पुलाजवळ धोक्याच्या पातळीवरील पाणी कमी झाल्याने हा पूल सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. दुपारी दीड वाजता आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, आदी कार्यकर्त्यांसह पंचगंगा पुलाच्या पश्चिमेच्या बाजूस आले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांना बोलावून घेतले. मच्छिंद्रीपेक्षाही खाली पाणी गेल्याचे निदर्शनास आणून देऊन वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. गुळवणी यांनी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून फक्त दुचाकी वाहतुकीस परवानगी दिली. नरके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी दुचाकीने शिवाजी पुलावरून शहरात प्रवेश केला. वाहतुकीस लेखी मंजुरी नसल्याने पोलिसांनी पुन्हा दुपारी पुलावरील वाहतूक रोखली. संतप्त झालेले नरके पुन्हा पुलावर आले. त्यांनी करवीर तहसीलदार योगेश खरमाटे, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी हुज्जत घातली. नरके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर फक्त दुचाकीसाठी वाहतुकीस परवानगी दिली.अधिकारी शिरोळ दौऱ्यावर पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने शिवाजी पुलावरून वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनातील काही अधिकारी कोल्हापूर शहरात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही मंगळवारी दिवसभर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी शिरोळला कन्यागत महापर्वाकडे गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरके यांनी प्रशासनास धारेवर धरले. रॅलीने जल्लोषी प्रवेशशिवाजी पुलाच्या पश्चिमेकडून आमदार चंद्रदीप नरके यांनी दुचाकी रॅलीने कोल्हापूर शहरात जल्लोष करीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, इंद्रजित पाटील, रमेश कुंभार, जयवंत कुंभार, अमित पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.