शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

By admin | Updated: August 10, 2016 01:11 IST

चंद्रदीप नरके यांचे आंदोलन : प्रशासनाची कानउघाडणी; पुलाची आज पुन्हा पाहणी

कोल्हापूर : पुराचे पाणी काही प्रमाणात उतरल्यानंतर मंगळवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवाजी पुलावर आंदोलन केल्यानंतर हा पूल किमान दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ही परवानगी दिली. पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे हा पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गे महामार्गाकडे वळविली होती; पण हा पूल बंद केल्यामुळे शहरालगतच्या अनेक गावांतील ग्रामस्थांची मोठी कुचंबणा झाली होती.मंगळवारी शिवाजी पुलाजवळ धोक्याच्या पातळीवरील पाणी कमी झाल्याने हा पूल सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. दुपारी दीड वाजता आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, आदी कार्यकर्त्यांसह पंचगंगा पुलाच्या पश्चिमेच्या बाजूस आले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांना बोलावून घेतले. मच्छिंद्रीपेक्षाही खाली पाणी गेल्याचे निदर्शनास आणून देऊन वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. गुळवणी यांनी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून फक्त दुचाकी वाहतुकीस परवानगी दिली. नरके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी दुचाकीने शिवाजी पुलावरून शहरात प्रवेश केला. वाहतुकीस लेखी मंजुरी नसल्याने पोलिसांनी पुन्हा दुपारी पुलावरील वाहतूक रोखली. संतप्त झालेले नरके पुन्हा पुलावर आले. त्यांनी करवीर तहसीलदार योगेश खरमाटे, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी हुज्जत घातली. नरके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर फक्त दुचाकीसाठी वाहतुकीस परवानगी दिली.अधिकारी शिरोळ दौऱ्यावर पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने शिवाजी पुलावरून वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनातील काही अधिकारी कोल्हापूर शहरात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही मंगळवारी दिवसभर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी शिरोळला कन्यागत महापर्वाकडे गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरके यांनी प्रशासनास धारेवर धरले. रॅलीने जल्लोषी प्रवेशशिवाजी पुलाच्या पश्चिमेकडून आमदार चंद्रदीप नरके यांनी दुचाकी रॅलीने कोल्हापूर शहरात जल्लोष करीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, इंद्रजित पाटील, रमेश कुंभार, जयवंत कुंभार, अमित पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.