शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

By admin | Updated: August 10, 2016 01:11 IST

चंद्रदीप नरके यांचे आंदोलन : प्रशासनाची कानउघाडणी; पुलाची आज पुन्हा पाहणी

कोल्हापूर : पुराचे पाणी काही प्रमाणात उतरल्यानंतर मंगळवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवाजी पुलावर आंदोलन केल्यानंतर हा पूल किमान दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ही परवानगी दिली. पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे हा पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गे महामार्गाकडे वळविली होती; पण हा पूल बंद केल्यामुळे शहरालगतच्या अनेक गावांतील ग्रामस्थांची मोठी कुचंबणा झाली होती.मंगळवारी शिवाजी पुलाजवळ धोक्याच्या पातळीवरील पाणी कमी झाल्याने हा पूल सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. दुपारी दीड वाजता आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, आदी कार्यकर्त्यांसह पंचगंगा पुलाच्या पश्चिमेच्या बाजूस आले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांना बोलावून घेतले. मच्छिंद्रीपेक्षाही खाली पाणी गेल्याचे निदर्शनास आणून देऊन वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. गुळवणी यांनी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून फक्त दुचाकी वाहतुकीस परवानगी दिली. नरके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी दुचाकीने शिवाजी पुलावरून शहरात प्रवेश केला. वाहतुकीस लेखी मंजुरी नसल्याने पोलिसांनी पुन्हा दुपारी पुलावरील वाहतूक रोखली. संतप्त झालेले नरके पुन्हा पुलावर आले. त्यांनी करवीर तहसीलदार योगेश खरमाटे, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी हुज्जत घातली. नरके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर फक्त दुचाकीसाठी वाहतुकीस परवानगी दिली.अधिकारी शिरोळ दौऱ्यावर पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने शिवाजी पुलावरून वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनातील काही अधिकारी कोल्हापूर शहरात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही मंगळवारी दिवसभर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी शिरोळला कन्यागत महापर्वाकडे गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरके यांनी प्रशासनास धारेवर धरले. रॅलीने जल्लोषी प्रवेशशिवाजी पुलाच्या पश्चिमेकडून आमदार चंद्रदीप नरके यांनी दुचाकी रॅलीने कोल्हापूर शहरात जल्लोष करीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, इंद्रजित पाटील, रमेश कुंभार, जयवंत कुंभार, अमित पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.