शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दोन हजार कोटी रूपयांच्या नोटा जमा!

By admin | Updated: November 13, 2016 01:11 IST

इतक्या नोटा ठेवायच्या कोठे ?: सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा बँकांसमोर प्रश्न

सातारा/रत्नागिरी : पाचशे अन् हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकांमध्ये उसळलेली गर्दी तिसऱ्या दिवशीही कायमच होती. गेल्या तीन दिवसांत सातारा जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे एक हजार कोटीच्या रद्द नोटा जमा झाल्या आहेत. अशीच स्थिती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. या दोन जिल्ह्यांतील बँकामध्येही एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. बँकांत असलेल्या जागांमध्ये या नोटा ठेवायच्या कशा, सांभाळायच्या कशा, असा प्रश्न बँकांसमोर उभा आहे. नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत नेल्या जाणार आहेत. मात्र, देशभरात नव्या नोटांचे तसेच चलनातील इतर नोटांचे वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे काम वाढलेले असल्याने जुन्या नोटा परत जाण्याला अजून कालावधी लागू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र तोपर्यंत आधीच नोटांचा प्रश्न मर्यादांसमोर उभा राहिला आहे.सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खासगी अन् ग्रामीण अशा एकूण ३३ बँकांच्या ५४८ शाखा कार्यरत आहेत. पहिल्या दोन दिवसांमध्ये ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या ६२ शाखांमध्ये ६० कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिराळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात १६ कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ३१३ शाखांमध्ये एका दिवसात दीडशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती प्रभारी सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या रद्द नोटा बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिसऱ्या दिवशीही कायम होती. तीन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये मिळून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी १00 रुपयांच्या व काही प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटाही जिल्ह्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)कर्मचारी व्यस्त : काऊंटरची वेळ रविवारीही जास्तया बँकेच्या एखाद्या शाखेची महिनाभराची उलाढाल जेवढी असते, तेवढी रक्कम केवळ तीन दिवसांमध्ये मोजण्यात सर्व बँक कर्मचारी व्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. रांगेत उभारून बँकेत जमा केलेल्या नोटांची ही आकडेवारी आहे.खातेदारांच्या सोयीसाठी तीन वाजता बंद होणारा देवघेव व्यवहार सध्या साडेपाच, सहा वाजेपर्यंत सुरू आहे. रविवारीही तो उशिरापर्यंतच सुरू ठेवला जाणार आहे.