शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘राज्य नाट्य’च्या अंतिम फेरीसाठी हवीत दोन नाटके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:49 IST

इंदुमती गणेश,कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक बदल केले तर कलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणार असून, याबाबतचा प्रस्ताव ...

ठळक मुद्देप्रस्ताव शासनाच्या विचाराधीनकलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणारकोल्हापूर केंद्रावरून दरवर्षी २२ ते २३ संघ राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग

इंदुमती गणेश,

कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक बदल केले तर कलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणार असून, याबाबतचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे.

कोल्हापुरातील रंगकर्मींच्या प्रयत्नाला यश येऊन येथे सहा वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. या सगळ्या संघांमधून प्रथम येणाºया एका संघाला अंतिम फेरीसाठी पाठविले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत एका केंद्रावरील आठ नाटकांतून एक नाटक याप्रमाणे सादरीकरण करणाºया संघांच्या संख्येवर अंतिम फेरीला जाणारे संघ निवडले जात असत.

संघांची संख्या जास्त असली तर एका केंद्रावरून दोन ते तीन नाटके अंतिम फेरीत सादरीकरण करायची. मात्र ही पद्धत राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने बदलली व एका प्राथमिक केंद्रावरून केवळ पहिले येणारे एकमेव नाटक अंतिम फेरीसाठी निवडण्यात येऊ लागले. कोल्हापूर केंद्रावरून दरवर्षी २२ ते २३ संघ राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतात. त्यात कोल्हापूर शहर ग्रामीणसह अन्य शहरांतील नाट्यसंस्थांचाही सहभाग असतो. यंदा चार-पाच संघांची माघार झाल्याने जवळपास १८ संघ राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा गाजविणार आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने नाटकांचे सादरीकरण होत असताना पहिल्या तीन क्रमांकांच्या नाटकांमध्ये दोन-तीन गुणांची तफावत असते; त्यामुळे अन्य संघांना अंतिम फेरीतील सादरीकरणाची संधी गमवावी लागते. एवढ्या मोठ्या संख्येने सादर होणाºया नाटकांपैकी एकाच संघाला अंतिम फेरीसाठी निवडले जात असल्याने सादरीकरणाचा कस लागत असला तरी अन्य संघांना अंतिम फेरीच्या संधीसाठी फारसा वाव राहत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच नाटकांच्या सादरीकरण केलेल्या आठ संघांमागे एक संघ अशा रीतीने अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड व्हावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे.दोनशेहून अधिक कलाकारांना व्यासपीठव्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपटांचा पाया म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा असते. त्यातून तावून सुलाखून निघालेला कलाकार यश मिळवितो. या स्पर्धेने नाना पाटेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर यांसारखे नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. ‘राज्य नाट्य’मध्ये भाग घेणाºया संघांद्वारे रंगमंच आणि बॅकस्टेज अशा जवळपास २०० हून अधिक कलाकारांना हा अनुभव समृद्ध करतो.

राज्य नाट्य स्पर्धेत उत्तमोत्तम सादरीकरण करून आमच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला; पण अजून आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबाबत परीक्षकांची विचार करण्याची पद्धती कशी असते हे समजत नाही. त्यामुळे एका केंद्रावरून दोन-तीन संघांना अंतिम फेरीत सादरीकरण करता आले तर भाग घेणाºया संघांची उमेद आणि संधी वाढणार आहे.- संजय मोहिते (फिनिक्स क्रिएशन)राज्य नाट्य स्पर्धा ही एकमेव अशी चळवळ आहे, ज्यात ग्रामीण भागातील कलाकारांनाही वाव मिळतो. त्यांच्याकडून वर्षभर प्रबोधनाचे काम सुरू असते. आर्थिक अडचणींसह संघर्षातून मार्ग काढत संघ रंगमंचावर सादरीकरणासाठी येतात. नाटकांची संख्या कमी होत असताना या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नावीन्याची जोड दिली गेली पाहिजे.सुनील माने (हनुमान तरुण मंडळ)