शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

‘राज्य नाट्य’च्या अंतिम फेरीसाठी हवीत दोन नाटके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:49 IST

इंदुमती गणेश,कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक बदल केले तर कलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणार असून, याबाबतचा प्रस्ताव ...

ठळक मुद्देप्रस्ताव शासनाच्या विचाराधीनकलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणारकोल्हापूर केंद्रावरून दरवर्षी २२ ते २३ संघ राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग

इंदुमती गणेश,

कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक बदल केले तर कलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणार असून, याबाबतचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे.

कोल्हापुरातील रंगकर्मींच्या प्रयत्नाला यश येऊन येथे सहा वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. या सगळ्या संघांमधून प्रथम येणाºया एका संघाला अंतिम फेरीसाठी पाठविले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत एका केंद्रावरील आठ नाटकांतून एक नाटक याप्रमाणे सादरीकरण करणाºया संघांच्या संख्येवर अंतिम फेरीला जाणारे संघ निवडले जात असत.

संघांची संख्या जास्त असली तर एका केंद्रावरून दोन ते तीन नाटके अंतिम फेरीत सादरीकरण करायची. मात्र ही पद्धत राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने बदलली व एका प्राथमिक केंद्रावरून केवळ पहिले येणारे एकमेव नाटक अंतिम फेरीसाठी निवडण्यात येऊ लागले. कोल्हापूर केंद्रावरून दरवर्षी २२ ते २३ संघ राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतात. त्यात कोल्हापूर शहर ग्रामीणसह अन्य शहरांतील नाट्यसंस्थांचाही सहभाग असतो. यंदा चार-पाच संघांची माघार झाल्याने जवळपास १८ संघ राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा गाजविणार आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने नाटकांचे सादरीकरण होत असताना पहिल्या तीन क्रमांकांच्या नाटकांमध्ये दोन-तीन गुणांची तफावत असते; त्यामुळे अन्य संघांना अंतिम फेरीतील सादरीकरणाची संधी गमवावी लागते. एवढ्या मोठ्या संख्येने सादर होणाºया नाटकांपैकी एकाच संघाला अंतिम फेरीसाठी निवडले जात असल्याने सादरीकरणाचा कस लागत असला तरी अन्य संघांना अंतिम फेरीच्या संधीसाठी फारसा वाव राहत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच नाटकांच्या सादरीकरण केलेल्या आठ संघांमागे एक संघ अशा रीतीने अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड व्हावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे.दोनशेहून अधिक कलाकारांना व्यासपीठव्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपटांचा पाया म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा असते. त्यातून तावून सुलाखून निघालेला कलाकार यश मिळवितो. या स्पर्धेने नाना पाटेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर यांसारखे नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. ‘राज्य नाट्य’मध्ये भाग घेणाºया संघांद्वारे रंगमंच आणि बॅकस्टेज अशा जवळपास २०० हून अधिक कलाकारांना हा अनुभव समृद्ध करतो.

राज्य नाट्य स्पर्धेत उत्तमोत्तम सादरीकरण करून आमच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला; पण अजून आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबाबत परीक्षकांची विचार करण्याची पद्धती कशी असते हे समजत नाही. त्यामुळे एका केंद्रावरून दोन-तीन संघांना अंतिम फेरीत सादरीकरण करता आले तर भाग घेणाºया संघांची उमेद आणि संधी वाढणार आहे.- संजय मोहिते (फिनिक्स क्रिएशन)राज्य नाट्य स्पर्धा ही एकमेव अशी चळवळ आहे, ज्यात ग्रामीण भागातील कलाकारांनाही वाव मिळतो. त्यांच्याकडून वर्षभर प्रबोधनाचे काम सुरू असते. आर्थिक अडचणींसह संघर्षातून मार्ग काढत संघ रंगमंचावर सादरीकरणासाठी येतात. नाटकांची संख्या कमी होत असताना या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नावीन्याची जोड दिली गेली पाहिजे.सुनील माने (हनुमान तरुण मंडळ)