शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

राज्य नाट्यच्या अंतिमसाठी जाणार दोन नाटके, शासनाचा निर्णय : लोकमत‘ने मांडला होता विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:51 IST

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय बुधवारी सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला निर्णय ‘लोकमत’ने दिले होते ५ नोव्हेंबरला वृत्त

कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर केंद्रातूनही दोन नाटके अंतिम फेरीसाठी जाणार आहेत.

‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरला राज्य नाट्यच्या अंतिमसाठी हवीत दोन नाटके असे वृत्त दिले होते. फक्त त्यासंबंधीचा अधिकृत आदेश न निघाल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्याचा मार्गही मोकळा झाला.

हौशी रंगभूमी चळवळ जपण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील एकूण १९ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. कोल्हापुरात ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात ही स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली.

तब्बल १८ संघांनी त्यामध्ये भाग घेतला. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपली की दुसऱ्याच दिवशी परीक्षकांकडून संयोजकांना निकाल दिला जातो. त्यांच्याकडून तो सांस्कृतिक विभागाकडे जाऊन अधिकृतरीत्या प्रसिद्ध केला जातो. या प्रक्रियेला फार तर दोन ते तीन दिवस लागतात. मात्र स्पर्धा संपून आठ दिवस झाले तरी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला नव्हता.

अगदी सुरुवातीला एका केंद्रावरील आठ नाटकांमागे एक नाटक या प्रमाणात अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड केली जात असे. मात्र नंतर कितीही नाटके सादर झाली तरी त्यातील एकच नाटक पाठविले जाऊ लागले.

सध्या रंगभूमीची नवी वाटचाल सुरू असलेल्या अनेक हौशी संस्थांकडून दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले जाते. पहिल्या क्रमांकासाठी अठरा ते वीस संघांमध्ये स्पर्धा लागते. काही वेळा एक-दोन गुणांच्या फरकाने त्यांची अंतिम फेरीसाठी निवड हुकते. असे होऊ नये यासाठी संघांनी दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविण्यात यावीत, अशी मागणी होती.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एका केंद्रावर पंधरापेक्षा जास्त नाटके सादर होत असतील तर दोन नाटके अंतिमसाठी स्वीकारली जातील, असे जाहीर केले होते त्याचा अधिकृत आदेश निघाल्याने दोन नाटकांना अंतिम साठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

 

टॅग्स :entertainmentकरमणूकGovernmentसरकार