शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्य नाट्यच्या अंतिमसाठी जाणार दोन नाटके, शासनाचा निर्णय : लोकमत‘ने मांडला होता विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:51 IST

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय बुधवारी सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला निर्णय ‘लोकमत’ने दिले होते ५ नोव्हेंबरला वृत्त

कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर केंद्रातूनही दोन नाटके अंतिम फेरीसाठी जाणार आहेत.

‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरला राज्य नाट्यच्या अंतिमसाठी हवीत दोन नाटके असे वृत्त दिले होते. फक्त त्यासंबंधीचा अधिकृत आदेश न निघाल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्याचा मार्गही मोकळा झाला.

हौशी रंगभूमी चळवळ जपण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील एकूण १९ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. कोल्हापुरात ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात ही स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली.

तब्बल १८ संघांनी त्यामध्ये भाग घेतला. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपली की दुसऱ्याच दिवशी परीक्षकांकडून संयोजकांना निकाल दिला जातो. त्यांच्याकडून तो सांस्कृतिक विभागाकडे जाऊन अधिकृतरीत्या प्रसिद्ध केला जातो. या प्रक्रियेला फार तर दोन ते तीन दिवस लागतात. मात्र स्पर्धा संपून आठ दिवस झाले तरी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला नव्हता.

अगदी सुरुवातीला एका केंद्रावरील आठ नाटकांमागे एक नाटक या प्रमाणात अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड केली जात असे. मात्र नंतर कितीही नाटके सादर झाली तरी त्यातील एकच नाटक पाठविले जाऊ लागले.

सध्या रंगभूमीची नवी वाटचाल सुरू असलेल्या अनेक हौशी संस्थांकडून दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले जाते. पहिल्या क्रमांकासाठी अठरा ते वीस संघांमध्ये स्पर्धा लागते. काही वेळा एक-दोन गुणांच्या फरकाने त्यांची अंतिम फेरीसाठी निवड हुकते. असे होऊ नये यासाठी संघांनी दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविण्यात यावीत, अशी मागणी होती.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एका केंद्रावर पंधरापेक्षा जास्त नाटके सादर होत असतील तर दोन नाटके अंतिमसाठी स्वीकारली जातील, असे जाहीर केले होते त्याचा अधिकृत आदेश निघाल्याने दोन नाटकांना अंतिम साठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

 

टॅग्स :entertainmentकरमणूकGovernmentसरकार