शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्यच्या अंतिमसाठी जाणार दोन नाटके, शासनाचा निर्णय : लोकमत‘ने मांडला होता विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:51 IST

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय बुधवारी सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला निर्णय ‘लोकमत’ने दिले होते ५ नोव्हेंबरला वृत्त

कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या स्पर्धेपासूनच होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर केंद्रातूनही दोन नाटके अंतिम फेरीसाठी जाणार आहेत.

‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरला राज्य नाट्यच्या अंतिमसाठी हवीत दोन नाटके असे वृत्त दिले होते. फक्त त्यासंबंधीचा अधिकृत आदेश न निघाल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्याचा मार्गही मोकळा झाला.

हौशी रंगभूमी चळवळ जपण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील एकूण १९ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. कोल्हापुरात ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात ही स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली.

तब्बल १८ संघांनी त्यामध्ये भाग घेतला. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपली की दुसऱ्याच दिवशी परीक्षकांकडून संयोजकांना निकाल दिला जातो. त्यांच्याकडून तो सांस्कृतिक विभागाकडे जाऊन अधिकृतरीत्या प्रसिद्ध केला जातो. या प्रक्रियेला फार तर दोन ते तीन दिवस लागतात. मात्र स्पर्धा संपून आठ दिवस झाले तरी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला नव्हता.

अगदी सुरुवातीला एका केंद्रावरील आठ नाटकांमागे एक नाटक या प्रमाणात अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड केली जात असे. मात्र नंतर कितीही नाटके सादर झाली तरी त्यातील एकच नाटक पाठविले जाऊ लागले.

सध्या रंगभूमीची नवी वाटचाल सुरू असलेल्या अनेक हौशी संस्थांकडून दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले जाते. पहिल्या क्रमांकासाठी अठरा ते वीस संघांमध्ये स्पर्धा लागते. काही वेळा एक-दोन गुणांच्या फरकाने त्यांची अंतिम फेरीसाठी निवड हुकते. असे होऊ नये यासाठी संघांनी दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविण्यात यावीत, अशी मागणी होती.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एका केंद्रावर पंधरापेक्षा जास्त नाटके सादर होत असतील तर दोन नाटके अंतिमसाठी स्वीकारली जातील, असे जाहीर केले होते त्याचा अधिकृत आदेश निघाल्याने दोन नाटकांना अंतिम साठी संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

 

टॅग्स :entertainmentकरमणूकGovernmentसरकार