शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

‘स्वाईन फ्लू’ने दोन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. ...

ठळक मुद्दे♦मृत रत्नागिरी, गांधीनगरातील, आरोग्य यंत्रणा खडबडली♦जिल्'ात १९ रुग्णांवर उपचार सुरू;♦उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. त्यामुळे जानेवारी २०१७ नंतर जिल्'ात ‘स्वाईन’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्'ातील शासकीय रुग्णालयात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ८ रुग्ण हे सीपीआरमध्ये दाखल आहेत.बुधवारी मृत्यू झालेल्यांतील रघुनाथ सावंत यांना दि. १६ जुलैला उपचारासाठी सीपीआर रग्णालयात दाखल केले होते. २० जूननंतर त्यांच्यात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना सीपीआरमधील ‘स्वाईन’च्या विशेष कक्षात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर ‘स्वाईन’ प्रतिकार करणारे औषधोपचार सुरू होते; पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे लता कुसरेजा या महिलेतही स्वाईनसदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना २० जुलैपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्याही रक्ताची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचाही बुधवारी मृत्यू झाला.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि ऊन या दोन हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढतो. या बदलत्या वातावरणामुळे विशेषत: ग्रामीण भागात संख्या लक्षणीय दिसत आहे. प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्षानंतर आजार बळावल्यावर रुग्ण गंभीर अवस्थेत सीपीआरकडे येत असल्याचे दिसत आहे.सध्या जिल्'ात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये १२ पॉझिटिव्ह तर ७ संशयित रुग्ण आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह ३ तर ५ संशयित रुग्णांची वाढ झाली, असून ते सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. या पॉझिटिव्ह तीन रुग्णांपैकी २ कोल्हापूर शहरातील तर १ रुग्ण हा सांगली शहरातील आहे तर आठ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलाआतापर्यंत १५१ रुग्णांवर उपचारजानेवारीपासून आतापर्यंत १५१ स्वाईन फ्लूची लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६५ पॉझिटिव्ह होते, तर उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.दक्षता घ्या..नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळणे. सर्दी व खोकला आल्यावर तोंडावर रूमाल लावणे, थंडी, ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, उलटी, मळमळ अशी ‘स्वाईन’ची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यास ‘स्वाईन’चा संसर्ग रोखता येतो.१५ पैकी ८ मृत कोल्हापूर जिल्'ातीलगेल्या सात महिन्यांत ‘स्वाईन’मुळे जिल्'ात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८ रुग्ण हे कोल्हापूर जिल्'ातील इतर ७ रुग्ण हे कर्नाटक, सांगली, रत्नागिरी या जिल्'ांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.