शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:47 IST

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.

ठळक मुद्देखासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : रामायण, महाभारत मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे पाच एप्रिलपर्यंत बंद होणार आहेत. त्यामध्ये सांगली, पंढरपूरसह महाराष्टतील २१ केंद्रांचा समावेश आहे.

देशात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर त्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाला काड्यांचा अ‍ॅन्टेना जोडावा लागत असे. डिजीटल युग येईपर्यंत घराघरांवर असा अ‍ॅन्टेना दिसत होता. सध्या अपवादात्मक कुठेतरी ते दिसतात. खासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले. काड्यांच्या अ‍ॅन्टेनाची जागा डिश अ‍ॅन्टेना आणि केबलने घेतली. तंत्रज्ञान बदलले तसे दूरदर्शनच्या अ‍ॅनालॉग टेरेस्टेरीयल ट्रान्समिशन (स्थानिक प्रक्षेपण केंद्र)चे महत्त्व कमी होऊ लागल्याने, तसेच ही यंत्रणा कालबाह्य ठरू लागल्याने टप्प्याटप्प्याने ती बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अर्थात प्रसार भारतीने घेतला.

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.

कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेणारदूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार आहे; मात्र त्यासाठी बदली होईल त्या ठिकाणी जाणे भाग आहे. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाºयांना हे कठीण वाटत आहे. नव्या ठिकाणी आपले कसे जमायचे, या विचाराने ते अस्वस्थ आहेत.ही केंद्रे होणार बंद : अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाट, खामगाव, खोपोली, किनवट, महाड, म्हासळे, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरगा, उमरखेड.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर