शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

महापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:20 IST

कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देमहापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छताआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची माहिती

कोल्हापूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.महानगरपालिकेच्या कोणत्याही मोहिमेवर लोकांचा विश्वास बसायचा असेल आणि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आधी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यात भाग घेऊन मोहीम राबविली पाहिजे. म्हणूनच शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आधी स्वत:पासून करायला हवी. याकरिता १५ दिवसांतून एकदा दैनंदिन कामातील फक्त दोन तास स्वत:चे कार्यालय व त्याच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे.

मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय,अग्निशामक स्थानक, रुग्णालये, कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करायची आहे, असे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता कधी केली आणि पुढे कोणत्या दिवशी करायची आहे, याचे रेकॉर्ड संबंधित विभागाने ठेवायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.दैनंदिन कचरा उठाव करताना कचऱ्यांचे वर्गीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे, अधिकाºयांनी सतत दक्ष राहून काम करावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, सोसायटी, गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करावे, अशा सूचनासुद्धा आयुक्त कलशेट्टी यांनी केल्या.शहरात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करावी. ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या तयार केल्या जातात, त्याच ठिकाणी प्रथम कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.‘स्वच्छता अ‍ॅप’चा प्रसार करावास्वच्छ भारत अभियान’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ला शहर परिसरातील १८ हजार नागरिक जोडले गेले आहेत; परंतु ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिक या अ‍ॅपशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त तक्रारी या अ‍ॅपवर याव्यात याकडे लक्ष द्या, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सुचविले. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर