शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

By admin | Updated: July 5, 2017 18:48 IST

सतेज पाटील यांची घणाघाती टीका : कॉँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संप मागे घेताना मंत्रिगटाचे प्रमुख तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिगटाच्या निर्णयाला बांधिल का नाहीत. मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची अपेक्षा मंत्रिगटाला माहिती नसल्याने राज्यमंत्रिमंडळात उघडउघड दोन गट पडल्याची घणाघाती टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफीच्या धोरणावर सडकून टीका करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, मंत्रिगटाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने राज्यातील शेतकऱ्याला आनंद झाला; पण त्यातील जाचक अटी पाहता सरकारची प्रामाणिक भावना लक्षात येते. दीड लाखावरील शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरली तरच त्यांना लाभ होणार. शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पडून असते तर त्याने आत्महत्या केल्या असत्या का? प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे; पण यातून प्रत्यक्षात किती रक्कम पदरात पडणार आहे. एका घरातील एकाच खातेदाराला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या सगळ्या अटी पाहता सरकारला शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करायचा नाही, हे स्पष्ट होते. फसव्या कर्जमाफी योजनेचा भांडाफोड करण्यासाठी यापुढे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार असून, जर त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करू. त्याची सुरुवात म्हणून येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाने करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकट साहेब नालासाठी घोडे घ्यायचे का? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्या. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम आमच्या जवळ असती तर कर्जमाफीसाठी तुमच्याकडे हात पसरले असते का? सरकारची कर्जमाफी म्हणजे नालासाठी घोडे विकत घेतल्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली. चौकट पंक्तीत बसवून उपाशी ठेवण्याचे पाप कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना पंक्तीत बसवून त्यांच्यासमोर ताटावर ताट झाकून ठेवले; पण ताट उघडल्यानंतर तांदूळ व कच्ची भाजी तशीच ठेवलेली दिसते. पंक्तीत बसवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्याचे पाप भाजप सरकारने केले असून, याचा जाब आगामी काळात शेतकरी निश्चितच विचारतील, असेही पाटील यांनी सांगितले.