शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

By admin | Updated: July 5, 2017 18:48 IST

सतेज पाटील यांची घणाघाती टीका : कॉँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संप मागे घेताना मंत्रिगटाचे प्रमुख तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिगटाच्या निर्णयाला बांधिल का नाहीत. मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची अपेक्षा मंत्रिगटाला माहिती नसल्याने राज्यमंत्रिमंडळात उघडउघड दोन गट पडल्याची घणाघाती टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफीच्या धोरणावर सडकून टीका करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, मंत्रिगटाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने राज्यातील शेतकऱ्याला आनंद झाला; पण त्यातील जाचक अटी पाहता सरकारची प्रामाणिक भावना लक्षात येते. दीड लाखावरील शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरली तरच त्यांना लाभ होणार. शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पडून असते तर त्याने आत्महत्या केल्या असत्या का? प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे; पण यातून प्रत्यक्षात किती रक्कम पदरात पडणार आहे. एका घरातील एकाच खातेदाराला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या सगळ्या अटी पाहता सरकारला शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करायचा नाही, हे स्पष्ट होते. फसव्या कर्जमाफी योजनेचा भांडाफोड करण्यासाठी यापुढे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार असून, जर त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करू. त्याची सुरुवात म्हणून येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाने करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकट साहेब नालासाठी घोडे घ्यायचे का? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्या. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम आमच्या जवळ असती तर कर्जमाफीसाठी तुमच्याकडे हात पसरले असते का? सरकारची कर्जमाफी म्हणजे नालासाठी घोडे विकत घेतल्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली. चौकट पंक्तीत बसवून उपाशी ठेवण्याचे पाप कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना पंक्तीत बसवून त्यांच्यासमोर ताटावर ताट झाकून ठेवले; पण ताट उघडल्यानंतर तांदूळ व कच्ची भाजी तशीच ठेवलेली दिसते. पंक्तीत बसवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्याचे पाप भाजप सरकारने केले असून, याचा जाब आगामी काळात शेतकरी निश्चितच विचारतील, असेही पाटील यांनी सांगितले.