शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

By admin | Updated: July 5, 2017 18:48 IST

सतेज पाटील यांची घणाघाती टीका : कॉँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संप मागे घेताना मंत्रिगटाचे प्रमुख तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिगटाच्या निर्णयाला बांधिल का नाहीत. मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची अपेक्षा मंत्रिगटाला माहिती नसल्याने राज्यमंत्रिमंडळात उघडउघड दोन गट पडल्याची घणाघाती टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफीच्या धोरणावर सडकून टीका करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, मंत्रिगटाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने राज्यातील शेतकऱ्याला आनंद झाला; पण त्यातील जाचक अटी पाहता सरकारची प्रामाणिक भावना लक्षात येते. दीड लाखावरील शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरली तरच त्यांना लाभ होणार. शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पडून असते तर त्याने आत्महत्या केल्या असत्या का? प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे; पण यातून प्रत्यक्षात किती रक्कम पदरात पडणार आहे. एका घरातील एकाच खातेदाराला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या सगळ्या अटी पाहता सरकारला शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करायचा नाही, हे स्पष्ट होते. फसव्या कर्जमाफी योजनेचा भांडाफोड करण्यासाठी यापुढे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार असून, जर त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करू. त्याची सुरुवात म्हणून येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाने करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकट साहेब नालासाठी घोडे घ्यायचे का? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्या. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम आमच्या जवळ असती तर कर्जमाफीसाठी तुमच्याकडे हात पसरले असते का? सरकारची कर्जमाफी म्हणजे नालासाठी घोडे विकत घेतल्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली. चौकट पंक्तीत बसवून उपाशी ठेवण्याचे पाप कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना पंक्तीत बसवून त्यांच्यासमोर ताटावर ताट झाकून ठेवले; पण ताट उघडल्यानंतर तांदूळ व कच्ची भाजी तशीच ठेवलेली दिसते. पंक्तीत बसवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्याचे पाप भाजप सरकारने केले असून, याचा जाब आगामी काळात शेतकरी निश्चितच विचारतील, असेही पाटील यांनी सांगितले.