शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोन आजी, एक माजी कोण मारणार 'बाजी'

By admin | Updated: October 28, 2015 00:42 IST

'सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख : नवख्या आणि तगड्या उमेदवारांचे तुल्यबळ आव्हान

कोल्हापूर : दोन विद्यमान नगरसेवक, एक माजी नगरसेवक, उद्योजक, कार्यकर्ता आणि अपक्ष यांच्यात प्रभाग क्रमांक ३९, राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. या प्रभागातून सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसकडून अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुरलीधर जाधव, भाजपचे विजय जाधव, शिवसेनेचे प्रदीप पोवार आणि जनार्दन कोरे, राजू पसारे, माधव सबनीस हे अपक्ष म्हणून लढत आहेत.हा प्रभाग ‘सर्वसाधारण’साठी खुला झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह अनेक दिग्गज या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करीत आहेत. त्याच प्रभागाशेजारील प्रभाग क्रमांक ३७ हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने व त्यातील दिग्गजांनी या प्रभागाकडे मोर्चा वळविल्याने येथे आता प्रतिष्ठेची व दिग्गजांची लढत पाहण्यास मिळत आहे. ‘उच्चशिक्षित आणि सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख असलेल्या ‘राजारामपुरी एक्स्टेंशन’मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू पसारे निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यावर त्यांनी बंडखोरी करून ते अपक्ष म्हणून लढत आहेत. प्रभागात केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना नाकारून काँग्रेसने अतुल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक असलेले अतुल पाटील हे आजवर विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यांच्या शिदोरीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विकासाच्या विविध योजना हा त्यांच्या प्रचारातील मुद्दा आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा हक्काचा तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने, ते या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागासह शेजारील अन्य प्रभागांत केलेल्या विकासकामांचा आरसा दाखवत, विकासाची ग्वाही देत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.दोन वेळा नेतृत्व केलेले माजी नगरसेवक प्रदीप पोवार हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या पत्नी सुषमा यांनी सुद्धा याच प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेतील तीन टर्मचा अनुभव, पूर्वीची विकासकामे यांच्या जोरावर ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या आजी-माजी नगरसेवकांना काँग्रेसच्या अतुल पाटील यांच्यासह भाजपच्या विजय जाधव यांनी आव्हान दिले आहे. जाधव हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागात त्यांनी अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. हा पाठपुरावा आणि पालकमंत्री पाटील यांच्या फंडातून केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांना साद घालत आहेत. माधव सबनीस आणि जनार्दन कोरे हे अपक्ष म्हणून लढत आहेत. एकंदरीत पाहता या सप्तरंगी लढतीत आजी-माजी नगरसेवकांना नवख्या अन् तगड्या उमेदवारांनी आव्हान दिले आहे. ( प्रतिनिधी )उमेदवारांचा कस लागणार‘उच्चशिक्षित व सुशिक्षित प्रभाग’ असल्याने या ठिकाणी आर्थिक प्रलोभनांना बळी पडणारे मतदार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्ष, उमेदवार, त्याचे चारित्र्य आणि काम करण्याची क्षमता यांचा विचार मतदार करणार आहेत. त्यामुळे प्रचारात उमेदवारांचा कस लागत आहे. प्रभागात एकूण ५२०० मतदारसंख्या आहे. यात मराठा समाज सर्वाधिक २६९१, ब्राह्मण समाज ११६५, सिंधी ७५, लिंगायत १६०, जैन १४१, दाक्षिणात्य ४१, साळी ४१, मारवाडी १७०, गुजराती २८, मागासवर्गीय २५४, मुस्लिम १४९, धनगर १९, ख्रिश्चन ८, बंगाली ३, उत्तर भारतीय १४, शिंपी २८, नाभिक १७, सुतार २१, सोनार १४, उर्वरित १५० असे साधारणत: मतदार आहेत.