शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चांदोलीत बोट उलटून दोन मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:29 IST

आंबा : चांदोली लघुपाटबंधाऱ्याच्या जलाशयात बोट उलटून पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ दीपक पाटील (वय २०, रा. चांदोली) व शुभम विजय पाटील (१४, रा. मणेर मळा, उचगाव, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (१२, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याला वाचविण्यात यश आले. सायंकाळी ही दुर्घटना घडली.बोट उलटली ...

आंबा : चांदोली लघुपाटबंधाऱ्याच्या जलाशयात बोट उलटून पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ दीपक पाटील (वय २०, रा. चांदोली) व शुभम विजय पाटील (१४, रा. मणेर मळा, उचगाव, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (१२, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याला वाचविण्यात यश आले. सायंकाळी ही दुर्घटना घडली.बोट उलटली त्या ठिकाणी पाण्याची खोली पंचवीस फुटांवर असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अख्खे गाव धरणावर आपत्कालीन यंत्रणा येण्याची वाट पाहत होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : शुभम पाटील व त्याचा मावस भाऊ सुमित हे दोघे तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरहून आजोळी सुटीस आले होते. आजी धोंडीबाई कुंभार यांच्या घराशेजारील गोपाळ पाटील याच्यासह हे दोघे चारच्या सुमारास धरणावर गेले. अंघोळ करण्यापूर्वी त्या तिघांनी धरणाशेजारील देशपांडे (पुणे) यांच्या प्लॉटिंगमध्ये नादुरुस्त पडलेली बोट जलाशयात आणून बोटिंग करण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक बोट उलटून तिघेही पाण्यात पडले. बोट उलटताच काठावर बसलेला अजय दीपक पाटील याने जलाशयात उडी मारून सुमितला पाण्याबाहेर काढले.गोपाळ हा पट्टीचा पोहणारा, पण शुभमला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. हे वृत्त समजताच सारे गाव धरणावर धावले. शाहूवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली; पण साडेसातला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मदतपथक वेळाने आल्याने नातेवाइकांकडून नाराजीशाहूवाडी पोलिसांनी सहाच्या सुमारास कोल्हापूर आपत्कालीन यंत्रणेला कळविले. नातेवाईक व ग्रामस्थ तीन तास मदतपथकाच्या वाटेकडे डोळे लावून होते; पण सायंकाळनंतर पाण्यात उतरत नसल्याचे मदत पथकाने स्पष्ट केल्याने नातेवाइकांत नाराजी पसरली. जलाशयात मत्स्य निमिर्ती केली जाते. मोठमोठे मासे जलाशयात आहेत. त्यामुळे त्वरित मृतदेह काढण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. आपत्कालीन यंत्रणा रात्रीपर्यंत न पोहोचल्याने रात्री उशिरा ग्रामस्थ धरणावरून परतले. शुभमची बहीण, आजी व गोपाळच्या नातेवाइकांनी धरणावर हंबरडा फोडला. दोन्ही कुटुंबातील नातेवाइकांचा आक्रोश ग्रामस्थांना सुन्न करणारा ठरला. गोपाळचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. तो लष्करात व पोलिसांत भरतीसाठी प्रयत्नशील होता. शुभम हा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे उचगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील व सदस्य अमर खोत यांनी घटनास्थळी भेट दिली.या दुर्घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. या दुर्घटनेमुळे चांदोली आणि उचगाववर शोककळा पसरली आहे.शुभम एकुलता एकशुभम हा एकुलता होता. तो त्र्यंबोलीदेवी हायस्कूल उचगाव येथे सातवीत शिकत होता. त्याचे वडील कांदा-बटाटा टेम्पोवर चालक असून, त्याची आई एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामाला जाते. तिला माहिती मिळताच ती चांदोलीकडे रवाना झाली आहे, तर वडील रत्नागिरी येथे गेल्याने ते कोल्हापूर येथे घरी येण्यासाठी निघाले आहेत. सध्या शुभमच्या घरी आजी-आजोबा असून, त्यांना या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत दिलेली नव्हती.