शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

जिल्ह्यात अडीच लाख नागरिक व्याधीग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ४९३ नागरिक व्याधीग्रस्त आढळले ...

कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ४९३ नागरिक व्याधीग्रस्त आढळले आहेत. या नागरिकांचे व ६० वर्षांवरील व्यक्तींचे पुन्हा महाआयुष्यअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज रुग्णांची संख्या १५०० ते १९०० च्या आसपास असून, मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० इतके आहे. यातील वयोवृद्धांचा मृत्यूदर ५३ टक्के, तर ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचे प्रमाण २० टक्के आहे. हा रुग्णवाढीचा दर व मृत्यूदर कमी व्हावा यासाठी जिल्हा, महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत आता पुन्हा एकदा या वयस्कर नागरिकांचे, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचे सर्वेक्षण केले जात आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी व लक्षणे असली तर कोराेना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे नसलेले सुपरस्प्रेडरमुळे हाेत असलेला संसर्ग आटोक्यात येणार आहे. तर उपचारासाठी उशिरा दाखल झाल्याने होणारे मृत्यू रोखणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

---

तालुका : व्याधीग्रस्त नागरिक

आजरा : १० हजार ६१३

भुदरगड : १२ हजार ४२८

चंदगड : १२ हजार ०१३

गडहिंग्लज : १३ हजार ९२६

गगनबावड़ा : १ हजार ७१४

हातकणंगले : २७ हजार ४२४

करवीर : १३०

कागल : १५ हजार ५१०

पन्हाळा : १३ हजार ०७८

राधानगरी : २० हजार २५०

शाहूवाडी : १० हजार २५५

शिरोळ : १६ हजार ६४५

शहरी विभाग : ३९ हजार ४९३

कोल्हापूर महापालिका क्षेत्र : ५० हजार ४

एकूण जिल्हा : २ लाख ४३ हजार ४९३

--

एकूण कुटुंब संख्या : ८ लाख ८९ हजार १८९

सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या : ८ लाख ८४ हजार ९३५

सर्वेक्षणासाठीची पथके : २६

पथकातील कर्मचारी : २ हजार २६०

---

सारी, इलीचे पाच हजार रुग्ण

महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने ऑक्टोबर महिन्यात केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात सारीचे २२६ व इली आजाराचे ४ हजार ७८२ रुग्ण आढळून आले.

--

पुढे काय

फेरसर्वेक्षणातून या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर त्यातील किती व्याधीग्रस्तांनी अजून लस घेतलेली नाही, याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.

---