शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारी सरणावरून परतली बारा तासांसाठी

By admin | Updated: July 28, 2014 23:19 IST

सोनाळी येथील घटना : गुलालातील तिरडीवरून उतरवले खाली

रमेश वारके- बोरवडे - जाऊ का नको, जाऊ का नको म्हणत म्हातारी मरता मरता जिवंत झाली. सरणावरून परत आली. मग तिकडे सरणावर कोंबडी जाळली. पुन्हा बारा तासांनी म्हातारीने जाणेच पसंत केले. ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ अशी म्हणण्याची घटना कागल तालुक्यातील सोनाळी येथे आज, सोमवारी सकाळी घडली. बारा तासांनंतर परत मृत्यूने त्या म्हातारीला कवटाळले. आक्काताई विष्णू खोत असे तिचे नाव आहे. या घटनेची चर्चा सोनाळीत रंगली.याबाबत माहिती अशी, सोनाळी (ता. कागल) येथील आक्काताई खोत या वृद्ध महिलेचा काल, रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मृत्यू झाला. याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी तिला तपासले. श्वासच बंद झाल्याने ती गेल्याचे निश्चित झाल्यानंतर याची माहिती पै-पाहुणे यांना देण्यात आली. गावातही बातमी समजली. बघता बघता ग्रामस्थ व पै-पाहुणे, नातेवाईक गोळा झाले. रात्री आठच्या दरम्यान तिचे स्मशानभूमीत सरणही रचण्यात आले.मृत्यूनंतरचा इतका निधी आटोपून त्या म्हातारीला गरम पाण्याची अंघोळ घालून तिला साडी नेसवून तिरडीवर झोपवले. कफन बांधून गुलाल टाकला. चार खांदेकरी ती तिरडी उचलण्यात पुढे आले असता त्यातील डी. एम. चौगुले यांचे लक्ष त्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाकडे गेले आणि त्या म्हातारीचे पोट हालत असल्याचे त्यांनी इतरांच्या लक्षात आणून दिले आणि म्हातारी जिवंत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ व नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. तिला तिरडीवरून खाली घेतले. बांधलेले कफन सोडून परत त्या म्हातारीला घरी नेले. सर्वजण या घटनेने आश्चर्यचकीत झाले. घरी आणल्यानंतर म्हातारीची हाताची हालचाल सुरू झाली. पण इकडे स्मशानभूमीत तिचे सरण रचले होते. प्रथापरंपरेनुसार त्या सरणात कोंबडी जाळून ते सरण पेटवण्यात आले. परंतु, हा क्षण अवघा बारा तासच टिकला. कदाचित नियतीला हे मान्य नसावे. मृत्यूने अखेर तिला आज, सोमवारी सकाळी सहा वाजता कवटाळले. तिच्या मृत्यूची खात्री झाल्यावरच तिला शेवटी अनंतात विलीन व्हावे लागले. घटना काहीही असो, नियतीपुढे सर्वजण छोटेच असतात. याचे प्रत्यंतर सोनाळीकरांना आज आले. या घटनेची चर्चा मात्र दिवसभर ग्रामस्थांत सुरू होती.