शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत पाऊण लाख नागरिकांचे पोट भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ ...

कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ हजार २६२ नागरिकांनी लाभ घेतला आहे. थाळ्यांची संख्या वाढविलेल्या दिवसापासूनची ही आकडेवारी असून, दिवसाला सरासरी पाच हजार ७०० पर्यंत थाळ्यांचे वितरण होत आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गोरगरिबांना अत्यंत चांगला उपयोग होत असून, त्यांची उपासमार टळली आहे.

एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने राज्य शासनाने १४ तारखेला संचारबंदी लागू केली, त्याच दिवशी गरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र थाळ्यांची संख्या कमी पडू लागल्याने शासनाने १६ तारखेला अध्यादेश काढून १७ तारखेपासून केंद्रांवरील वितरणाच्या दीडपट थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली. वेळेतदेखील एक तासाने वाढ करून चार वाजेपर्यंत करण्यात आली. ज्या केंद्रांना २०० थाळ्यांची मान्यता होती ती वाढून ३०० इतकी झाली. पूर्वी जिल्ह्याला दिवसाला ४ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते वाढून सहा६ हजार करण्यात आले.

थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली असली तरी लाभार्थ्यांअभावी रोज सहा हजारांऐवजी पाच हजार ६०० ते ५ हजार ८०० इतक्या थाळ्यांचे वितरण होत आहे. गेल्या १२ दिवसांत जिल्ह्यातील सर्व ३७ केंद्रांवरून ७४ हजारांहून अधिक नागरिकांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

---

तालुकानिहाय केंद्रांची संख्या

कोल्हापूर शहर : ९

हातकणंगले : ५

राधानगरी : ३

शिरोळ : ३

गडहिंग्लज : ३

पन्हाळा : ३

शाहूवाडी : २

गगनबावडा : २

कागल : २

चंदगड : २

आजरा : १

करवीर : १

भुदरगड : १

एकूण केंद्रसंख्या : ३७

रोज होणारे वितरण : ५ हजार ७०० ते ८००

--

मोबाईल आणि शिवभोजन...

मोबाईल क्रमांक नसेल तर शिवभोजन देऊच नये असे सरकारचे आदेश नाहीत; परंतु या व्यवहारात पारदर्शकता राहावी व शासनाने दिलेले जेवण गोरगरीब जनतेच्या मुखातच जावे यासाठी केंद्रचालकांना मोबाईल क्रमांकाच्या बाबतीत सक्त सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुर‌वठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी सांगितले. त्याबाबत ‘लोकमत’कडे लोकांकडून तक्रार आली होती. गोरगरिबांकडे मोबाईल नसतो; मग त्यांना जेवण मिळणार नाही का? अशी विचारणा करण्यात आली होती.