शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शेतकरी, वीट व्यावसायिकांना बारा कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:47 IST

उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड कृष्णा नदीकाठावरील असलेल्या मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी

ठळक मुद्देउदगाव, चिंचवाड अवैध माती उत्खनन प्रकरण : शेतकºयांना प्रशासनाचे आदेश जारी

उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड कृष्णा नदीकाठावरील असलेल्या मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी व वीट व्यावसायिकांना सुमारे बारा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वीटभट्टी व्यावसायिकांत खळखळ उडाली आहे. उदगावमध्ये १० कोटी ४१ लाख १८ हजार, तर चिंचवाडमध्ये २ कोटी १६ लाख ९ हजार इतका दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

उदगाव-चिंचवाड येथील माती उत्खननाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शरद चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना उदगाव-चिंचवाड येथील उत्खनन करण्यात आलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये एकूण ३३ हजार ४८७ ब्रॉस मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे समोर आले होते.

हा अहवाल मुंबई लोकायुक्त यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी तत्काळ दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उदगाव-चिंचवाडमधील बेकायदेशीरपणे माती उत्खनन केलेल्या शेतकºयांना प्रशासनाकडून दंड वसूल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनधिकृत उत्खनन केलेल्या मातीच्या बाजारभावाप्रमाणे तिप्पट रक्कम दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.पंधरा दिवसांच्या आत दंडात्मक रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येणार आहे, असे आदेश माती उत्खननदारांना लागू करण्यात आले आहेत.

ही रक्कम मुदतीत वसूल न झाल्यास उदगाव व चिंचवाडच्या तलाठ्यांनी उत्खननदार व्यक्तीच्या सात-बारा पत्रकी नोंद करून याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठविण्याचे आदेश तहसीलदार गजाजन गुरव यांनी काढला आहे. गेल्या दहा वर्षांपासून उदगाव-चिंचवाड परिसरात कृष्णा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून कमी मातीची रॉयटी भरून मोठ्या प्रमाणात मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत चिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी आवाज उठवून वीट व्यावसायिकांच्या विरोधात मोट बांधली होती. त्याला चांगले यश मिळाले आहे. मात्र, वीट व्यावसायिकांनी केलेले माती उत्खनन आता शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहे.'लोकमत'चा प्रभावउदगाव-चिंचवाड परिसरात बेकायदेशीरपणे माती उत्खनन होत असताना नागरिकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे ‘लोकमत’ने सातत्याने उदगाव-चिंचवाड परिसरातील होत असलेल्या माती उत्खननाबाबत प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवला होता. त्यामुळे आता माती उत्खननदारांना साडेबारा कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे परिसरात निसर्गाचे संवर्धन करून नागरिकांचे प्रश्न मांडल्याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक होत आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारriverनदी