शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निकालाच्या सुत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ...

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ४० टक्के अंतर्गत गुणांच्या आधारे सरासरी काढण्याच्या सुत्राव्दारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यातील अकरावीच्या वर्षाला बहुतांश विद्यार्थी हे रेस्ट ईअर मानतात. या वर्षामध्ये बारावीची तयारी करण्यावर भर देतात. त्यामुळे निकालाच्या सुत्राने बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. त्यांना गुणांची चिंता लागली आहे.

जिल्ह्यातील एकूण ५२,२९९ विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात सीबीएसईचे ५५०, तर राज्य शिक्षण मंडळाचे (स्टेट बोर्डाचे) ५१,७४९ विद्यार्थी आहेत. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे जाहीर केले. दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळवले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

सीबीएसईचे विद्यार्थी : ५५०

स्टेट बोर्डाचे विद्यार्थी : ५१७४९

प्रतिक्रिया

३० टक्के सूत्रं गणित बिघडवणार

कोरोनामुळे बारावीचा अंतिम निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे जाहीर होणार आहे. अकरावीला बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुण असतात. त्याचा बारावीच्या गुणांवर परिणाम होणार आहे. कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.

- संगीता घाडीगावकर, रूईकर कॉलनी

बारावीमध्ये वर्षभर तयारी करायची असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता यावर्षी परीक्षा होणार नाही. बारावीच्या अंतिम मूल्यांकनामध्ये अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार असल्याने गुणांबाबत थोडी चिंता वाटत आहे.

- तेजस पोवार, वळीवडे

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

बारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणाऱ्या गुणांचा अधिक विचार करू नये. यापुढे त्यांना काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यातील चांगल्या यशासाठी अभ्यासावर फोकस ठेवावा.

- डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

दहावी, अकरावीतील गुण हे बेस्ट ऑफ थ्री सुत्रानुसार मिळणार आहेत. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी यापुढील परीक्षा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ची शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य वाढवावीत.

- मुकुंद कांबळे, शिक्षक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय.

फोटो (१८०७२०२१-कोल-संगीता घाडीगावकर (एचएससी), तेजस पोवार (एचएससी), सरदार जाधव (प्राचार्य), मुकुंद कांबळे (शिक्षक)