शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सिंधुदुर्गनगरीत पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

रोगराईचा धोका : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंधुदुर्गनगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेले कित्येक महिने बंद असल्याने येथील रहिवाशांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच ठिकठिकाणी फुटलेली पाईपलाईन आणि ड्रेनेजची गळती यामुळे पुरवठा होत असलेले पाणी म्हणजे रोगराईला निमंत्रण ठरत आहे.जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीला नवनगर प्राधिकरण नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. १९९४ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली ही नळयोजना पूर्णपणे जीर्ण झाली आहे. येथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेली कित्येक महिने बंद पडली आहे. पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली आहे, गंजून गेली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, जिल्हाधिकारी कर्मचारी वसाहत, पोलीस कर्मचारी वसाहत आणि शासकीय कार्यालये, जिल्हा रूग्णालय यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बंगल्यानाही या नळयोजनेच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, या योजनेकडे जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.जिल्हा मुख्यालयाची नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यावर २० वर्षे झाली. त्यावेळी ओरोस तलाव, पिठढवळ नदी आणि दाभाचीवाडी तलाव या तिन्ही बाजूने पाण्याचा पुरवठा होत होता. मात्र, कालांतराने ओरोस तलाव आणि पिठढवळ नदीकडील पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड होऊन ती कित्येक वर्षे बंद आहे. आता केवळ दाभाचीवाडी तलावातील पाणी पंपाद्वारे टाकीत चढवून या पाण्याचा थेट कर्मचारी वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. टाकीतून पुरवठा होणारे पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाच बंद असल्याने अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी फुटलेले ड्रेनेज, पाईपलाईन यामुळे घाणीचे पाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. पुरवठा होत असलेले पाणी पिवळ््या रंगाचे गढूळ असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दुरूस्तीच्या नावाखाली खोदून ठेवलेली पाईपलाईन गेले काही महिने उघडीच आहे. त्यामुळे डासांचाही फैलाव वाढला आहे. जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नळयोजनेची तत्काळ दुरूस्ती करावी. पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी. येथील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यादृष्टीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)