शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीचा १ जूनचा मुहूर्त नाहीच !

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण : एमएच ०९ बाबत १५ जूननंतरच अधिसूचना शक्य; आश्वासन हवेतच

कोल्हापूर : कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून तयार केलेल्या रस्त्यांचा फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण झाला आहे. या रस्त्यासाठी नेमलेली फेरमूल्यांकन समिती पुढील दहा दिवसांत याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून सोमवार (दि. १) पासून कोल्हापूर पासिंगची (एमएच ०९) वाहने टोलमधून वगळणार व टोलमुक्ती करणार नसल्याचे दिसून येत आहेत. राज्य शासन एमएच ०९ बाबतची अधिसूचना १५ जूननंतर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ जूनपासून भाजप-शिवसेनेने कोल्हापूर टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन हवेतच विरण्याची शक्यता आहे.कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण केलेले रस्ते खराब असल्याचा शहरवासीयांबरोबर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा आरोप आहे. यासाठी यापूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात खराब रस्ते तपासणी व मूल्यांकनासाठी समिती नेमली. पण, या समितीने कधी अहवाल दिला, त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. काँग्रेसच्या जागी भाजप -शिवसेनेची सत्ता आली. या दोन्ही पक्षांनी कोल्हापूरचा टोल कोणत्याही स्थितीत घालवू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. या सरकारने आय. आर. बी.ने केलेल्या रस्त्यांसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली फेरमूल्यांकन समिती नेमली. या समितीमध्ये शहर अभियंता यांच्यासह वास्तुरचनाकार राजू सावंत, आदींचा सहभाग आहे. दहा दिवसांत शासनाला अहवाल देणारमध्यंतरी या फेरमूल्यांकन समितीने शहरातील विविध भागांची पाहणी करून सर्व्हे केला. जवळपास समितीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. अजूनही या समितीचे अहवालाचे काम सुरू असून पुढील दहा दिवसांत ही समिती अहवाल तयार करणार आहे व सदस्यांची मते अजमावून घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यानंतर ही फेरमूल्यांकन समिती हा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. राज्य शासन यावर विचार करून कोल्हापूर टोलमुक्त करणार की एमएच०९ क्रमांकाची वाहने वगळणार, यावर निर्णय होणार आहे.