शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

टोलमुक्तीचा १ जूनचा मुहूर्त नाहीच !

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण : एमएच ०९ बाबत १५ जूननंतरच अधिसूचना शक्य; आश्वासन हवेतच

कोल्हापूर : कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून तयार केलेल्या रस्त्यांचा फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण झाला आहे. या रस्त्यासाठी नेमलेली फेरमूल्यांकन समिती पुढील दहा दिवसांत याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून सोमवार (दि. १) पासून कोल्हापूर पासिंगची (एमएच ०९) वाहने टोलमधून वगळणार व टोलमुक्ती करणार नसल्याचे दिसून येत आहेत. राज्य शासन एमएच ०९ बाबतची अधिसूचना १५ जूननंतर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ जूनपासून भाजप-शिवसेनेने कोल्हापूर टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन हवेतच विरण्याची शक्यता आहे.कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण केलेले रस्ते खराब असल्याचा शहरवासीयांबरोबर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा आरोप आहे. यासाठी यापूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात खराब रस्ते तपासणी व मूल्यांकनासाठी समिती नेमली. पण, या समितीने कधी अहवाल दिला, त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. काँग्रेसच्या जागी भाजप -शिवसेनेची सत्ता आली. या दोन्ही पक्षांनी कोल्हापूरचा टोल कोणत्याही स्थितीत घालवू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. या सरकारने आय. आर. बी.ने केलेल्या रस्त्यांसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली फेरमूल्यांकन समिती नेमली. या समितीमध्ये शहर अभियंता यांच्यासह वास्तुरचनाकार राजू सावंत, आदींचा सहभाग आहे. दहा दिवसांत शासनाला अहवाल देणारमध्यंतरी या फेरमूल्यांकन समितीने शहरातील विविध भागांची पाहणी करून सर्व्हे केला. जवळपास समितीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. अजूनही या समितीचे अहवालाचे काम सुरू असून पुढील दहा दिवसांत ही समिती अहवाल तयार करणार आहे व सदस्यांची मते अजमावून घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यानंतर ही फेरमूल्यांकन समिती हा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. राज्य शासन यावर विचार करून कोल्हापूर टोलमुक्त करणार की एमएच०९ क्रमांकाची वाहने वगळणार, यावर निर्णय होणार आहे.