शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

‘शौचालय’ अनुदानातही हात धुण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 10, 2016 00:58 IST

जिल्हा परिषद : ‘सीईओं’च्या जागरूकतेमुळे २७ कोटी रुपयांच्या बोगसगिरीचा डाव उधळला

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी गावनिहाय फेरपडताळणी करून घेतल्याने जिल्ह्यातील अनेक गावांत नवीन शौचालय न बांधताच तब्बल २७ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान लाटण्याचा डाव फसला आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात हागणदारीमुक्त अभियान व्यापकपणे राबविले जात आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अंमलबजावणी केली जात आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकसहभाग घेऊन जिल्ह्यात प्रभावीपणे चळवळ निर्माण केली आहे. केंद्र, राज्य शासन शौचालय बांधणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पात्र लाभार्थ्याला प्रत्येकी १२ हजारांचे अनुदान देत आहे. चार हजारांवरून बारा हजार रुपये अनुदान झाल्यानंतर लाभासाठी झुंबड उडत आहे. त्यातूनच गाव, तालुका पातळीवरील यंत्रणेला हाताशी धरून शौचालय न बांधताच अनुदान लाटण्यासाठी अर्ज आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनास मिळाली.प्रशासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये किती कुटुंबांकडे शौचालय आहे किंवा नाही याची यादी घेतली. त्या यादीनुसार प्रत्येक गावात फेरपडताळणी केली. तालुका पातळीवरील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका यांच्यातर्फे प्रत्येक गावाची यादीप्रमाणे आॅगस्ट ते डिसेंबरअखेर शौचालयांची फेरपडताळणी केली. गगनबावडा तालुक्यातील तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठातील ग्रामविकास विभागाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यामध्ये शौचालय असतानाही केवळ अनुदानासाठी ‘नाही’ असे सांगून अर्ज केल्याचे समोर आले. याशिवाय अनेक दिवसांपासून स्थलांतर केले आहे, मृत आहे तरीही अर्ज केले आहेत, असेही दिसून आले. अशा पद्धतीने अतिशय काटेकोरपणे जिल्ह्यातील सर्व १०२९ गावांची तपासणी झाली. त्यामध्ये पात्र असलेल्या ११ हजार ४९६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार याप्रमाणे १२ कोटी २२ लाख ७२ हजार ८०० रुपये यंदा केले आहेत.सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातढपल्यासाठी केलेले अर्ज तालुकानिहाय असे : आजरा-६३८, भुदरगड- ६४२, चंदगड- १८६१, गडहिंग्लज-१०००, गगनबावडा -२११, हातकणंगले- ५७०४, कागल- १८०६, करवीर- ३७६६, पन्हाळा- १५०२, राधानगरी- ११९७, शाहूवाडी-१५४२, शिरोळ- २७३१.‘कारवाई म्हटल्यानंतर सत्य बाहेरशौचालय नाही’च्या यादीत नाव आहे. तुमच्यावर कारवाई होणार, असे सांगताच संबंधित कुटुंबाने शौचालय आहे, अशी सत्यस्थिती तपासणीच्या वेळी सांगितली. यावरूनही शौचालय न बांधता अनुदान लाटण्याचा हेतू अप्रत्यक्षरीत्या उघड झाला. त्यामुळे शौचालय बांधत असतानाचा आणि पूर्ण झालेला फोटो अनुदानासाठी आॅनलाईन अपलोड करण्याची सक्ती केली आहे. त्यानंतर ग्रामसेवकातर्फे तपासणी करून गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव येतो. तो मंजूर करून संबंधित लाभार्थ्याच्या नावे आरटीजीएस प्रणालीद्वारे थेट खात्यावर अनुदान जमा केले जात आहे.जुने शौचालय दाखवून..जिल्ह्यात १५ हजार २०७ जणांनी जुने शौचालय दाखवून, ६ हजार २४१ जणांनी स्थलांतरितांची नावे पुढे करून, तर ११५२ जणांनी मृत व्यक्तींची नावे घुसडून अनुदान उचलण्याचा कट केल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले.