शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 23:18 IST

अवधुतानंद स्वामी : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अँग्रिकल्चर फार्म येथे आयोजित कार्यक्रम

नवे पारगाव : मानव कल्याणासाठी धर्माची निर्मिर्ती झाली. प्रत्येक धर्माची शिकवण व तत्त्वे ही लोककल्याणकारी आहेत. सध्या धर्माच्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम काही विघ्नसंतोषी व्यक्तिंकडून सुरू असून, अशा धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका निर्माण झाला आहे, असे मत ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू अवधुतानंद स्वामीजी तथा जगन्नाथ कुंटे यांनी व्यक्त केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अँग्रिकल्चर फार्ममध्ये प. पू. ह. भ. प. यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या ६३व्या स्मृतिदिनी आयोजित ‘नर्मदा परिक्रमा-अध्यात्म आणि संवाद’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.प्रारंभी अवधुतानंद स्वामीजी-जगन्नाथ कुंटे त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.स्वामीजी म्हणाले, चमत्कारापेक्षा कर्तृत्व मोठे असते. कर्तृत्वाने माणसं मोठी होतात, असे सांगून त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, कबीर यांच्या विचारांची अनेक उदाहरणे दिली. जातिभेद मानू नका, नामस्मरण करण्यास देवळात जावे लागत नाही, घरी बसूनही ते करता येते. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यांनाच गुरू माना व त्यांचे नामस्मरण करा. स्त्रियांवर जो अन्याय करतो, असा धर्म काय कामाचा. सद्गुरुपेक्षा सद्गुरू स्त्री ही खरी शक्ति आहे. तिलाच तुम्ही गुरू माना, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वेश कोरे, प्रतिमा पाटील, शांतीदेवी पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. साबळे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)