शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 23:18 IST

अवधुतानंद स्वामी : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अँग्रिकल्चर फार्म येथे आयोजित कार्यक्रम

नवे पारगाव : मानव कल्याणासाठी धर्माची निर्मिर्ती झाली. प्रत्येक धर्माची शिकवण व तत्त्वे ही लोककल्याणकारी आहेत. सध्या धर्माच्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम काही विघ्नसंतोषी व्यक्तिंकडून सुरू असून, अशा धर्माच्या दलालांकडून देशाला खरा धोका निर्माण झाला आहे, असे मत ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू अवधुतानंद स्वामीजी तथा जगन्नाथ कुंटे यांनी व्यक्त केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अँग्रिकल्चर फार्ममध्ये प. पू. ह. भ. प. यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या ६३व्या स्मृतिदिनी आयोजित ‘नर्मदा परिक्रमा-अध्यात्म आणि संवाद’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.प्रारंभी अवधुतानंद स्वामीजी-जगन्नाथ कुंटे त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.स्वामीजी म्हणाले, चमत्कारापेक्षा कर्तृत्व मोठे असते. कर्तृत्वाने माणसं मोठी होतात, असे सांगून त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, कबीर यांच्या विचारांची अनेक उदाहरणे दिली. जातिभेद मानू नका, नामस्मरण करण्यास देवळात जावे लागत नाही, घरी बसूनही ते करता येते. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यांनाच गुरू माना व त्यांचे नामस्मरण करा. स्त्रियांवर जो अन्याय करतो, असा धर्म काय कामाचा. सद्गुरुपेक्षा सद्गुरू स्त्री ही खरी शक्ति आहे. तिलाच तुम्ही गुरू माना, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वेश कोरे, प्रतिमा पाटील, शांतीदेवी पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. साबळे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)