शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

नांगनूरचा दूषित पाणीप्रश्नी संघर्ष !

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

‘हिरण्यकेशी’त दूषित पाणी : नदीत मळी मिसळल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर

राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लजच्या पूर्वेकडील नांगनूर गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात मळीमिश्रित सांडपाणी मिसळते. त्याच ठिकाणी नळयोजनेचे जॅकवेल असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरूद्ध कारवाई व्हावी व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या ७ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र, माय-बाप सरकारला अजून जाग आलेली नाही.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नांगनूरची लोकवस्ती ३ हजार आहे. गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून ‘जलस्वराज्य’ प्रकल्पांतर्गत ३३ लाखांची नळयोजना राबविण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी गावातील नळांना मीटरही बसविण्यात आले आहेत. हिरण्यकेशी नदीच्या तीरावर जॅकवेल बांधण्यात आले आहे. ट्रेंच गॅलरीद्वारे नदीतील पाणी ६० फुटांवरून जॅकवेलमध्ये टाकून गावाला वितरीत केले जाते. याच जॅकवेलच्या परिसरात मळीमिश्रित सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अद्यापही बोअर आणि खासगी विहिरींचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरली आहे.संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यातून सोडण्यात येणारे मळीमिश्रित सांडपाणीच नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मिसळते. पाणी प्रदूषित होवून मासे मृत्यूमुखी पडतात. पाण्याला दुर्गंधी सुटते, जनावरेदेखील ते पाणी पित नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि मळीमिश्रित पाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध करावा, यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे.पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहारतलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकरांपासून तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.प्रदूषण मंडळाकडूनही बेदखलमहाराष्ट्र व कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळासह दिल्लीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील अर्ज-विनंत्या केल्या. मात्र, याबाबत अजूनही न्याय मिळालेला नाही.