शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांगनूरचा दूषित पाणीप्रश्नी संघर्ष !

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

‘हिरण्यकेशी’त दूषित पाणी : नदीत मळी मिसळल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर

राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लजच्या पूर्वेकडील नांगनूर गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात मळीमिश्रित सांडपाणी मिसळते. त्याच ठिकाणी नळयोजनेचे जॅकवेल असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरूद्ध कारवाई व्हावी व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या ७ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र, माय-बाप सरकारला अजून जाग आलेली नाही.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नांगनूरची लोकवस्ती ३ हजार आहे. गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून ‘जलस्वराज्य’ प्रकल्पांतर्गत ३३ लाखांची नळयोजना राबविण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी गावातील नळांना मीटरही बसविण्यात आले आहेत. हिरण्यकेशी नदीच्या तीरावर जॅकवेल बांधण्यात आले आहे. ट्रेंच गॅलरीद्वारे नदीतील पाणी ६० फुटांवरून जॅकवेलमध्ये टाकून गावाला वितरीत केले जाते. याच जॅकवेलच्या परिसरात मळीमिश्रित सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अद्यापही बोअर आणि खासगी विहिरींचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरली आहे.संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यातून सोडण्यात येणारे मळीमिश्रित सांडपाणीच नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मिसळते. पाणी प्रदूषित होवून मासे मृत्यूमुखी पडतात. पाण्याला दुर्गंधी सुटते, जनावरेदेखील ते पाणी पित नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि मळीमिश्रित पाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध करावा, यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे.पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहारतलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकरांपासून तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.प्रदूषण मंडळाकडूनही बेदखलमहाराष्ट्र व कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळासह दिल्लीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील अर्ज-विनंत्या केल्या. मात्र, याबाबत अजूनही न्याय मिळालेला नाही.